शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

सोयाबीनच्या उत्पादनात घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:30 IST

वाशिम - वाशिम जिल्ह्यात सोयाबीन सोंगणीची लगबग सुरू झाली असून, सोयाबीनच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. यावर्षी दोन लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकºयांना पावसाची योग्य प्रमाणात साथ मिळाली नाही. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर अल्पावधीतच पाऊस गायब ...

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर लागवड खर्चही वसूल होईना

वाशिम - वाशिम जिल्ह्यात सोयाबीन सोंगणीची लगबग सुरू झाली असून, सोयाबीनच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. यावर्षी दोन लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकºयांना पावसाची योग्य प्रमाणात साथ मिळाली नाही. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर अल्पावधीतच पाऊस गायब झाला. त्यानंतरही पावसात सातत्य नसल्याने काही शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने सोयाबीनला प्रचंड प्रमाणात हाणी पोहोचली. मृग नक्षत्रात पेरणी केलेल्या शेतकºयांनी आता सोयाबीन सोंगणी सुरू केली आहे. यावर्षी सोयाबीनच्या एकरी उत्पादनात घट येत आहे. एकरी दोन ते सात क्विंटलदरम्यान उत्पादन होत असल्याने लागवड खर्च व उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसविण्यात शेतकºयांचे ‘बजेट’ कोलमडून जात आहे. हलक्या जमिनीतून एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन येत आहे. त्यामुळे लागवड खर्चही वसूल होत नसल्याचा दावा शेतकºयांनी केला आहे. सोयाबीनला किमान सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव मिळणे अपेक्षीत आहे. शासनाने लागवड खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी महादेव सोळंके यांनी केली. दरम्यान, एकाचवेळी मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोंगणीला सुरूवात होत असल्याने ग्रामीण भागात मजूरांची टंचाई जाणवत आहे. मजूरीचे दरही वाढले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकºयांपुढील अडचणीत भर पडत आहे.