शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

चावडी वाचनाअभावी कर्जदार शेतकरी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 16:54 IST

वाशिम: राज्य निवडणुक आयोगाने शेतकरी कर्जमाफीच्या अर्ज यादी पडताळणीतून ग्रामपचांयत निवडणूक होत असलेल्या गावांना वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया गावांतील कर्जमाफीचे अर्ज सादर करणारे शेतकरी पात्र, अपात्रेबाबत संभ्रमात सापडले आहेत. शासनाने नैसर्गि आपत्तीत सापडलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ...

ठळक मुद्देपात्र, अपात्रता कळणार कशी? ग्रामपंचायत निवडणुकीच्या गावातील चित्र

वाशिम: राज्य निवडणुक आयोगाने शेतकरी कर्जमाफीच्या अर्ज यादी पडताळणीतून ग्रामपचांयत निवडणूक होत असलेल्या गावांना वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया गावांतील कर्जमाफीचे अर्ज सादर करणारे शेतकरी पात्र, अपात्रेबाबत संभ्रमात सापडले आहेत. 

शासनाने नैसर्गि आपत्तीत सापडलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय नियमित कर्जाची रक्कम भरणाºया शेतकºयांना २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचेही ठरविले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले. यानुसार निर्धारित २२ सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत १.२८ लाख शेतकºयांनी आॅनालाइन अर्ज सादर के ले आहेत. आता या अर्जात शासनाच्या निकषानुसार पात्र असणाºया शेतकºयांची निवड करण्यासह अर्जापासून वंचित राहिलेल्या म्हणजेच आॅनलाइन अर्ज करूनही यादीत नाव नसलेल्या शेतकºयांची माहिती घेण्यासाठी चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तथापि, ही प्रक्रिया ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावांत राबविली जाऊ नये, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे यंदा निवडणूक होऊ घातलेल्या २७३ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कर्जदार शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. चावडी वाचन प्रक्रियेनुसार इतर गावांतील शेतकºयांना त्यांच्या पात्र, अपात्रतेची माहिती मिळू शकेल; परंतु ज्या गावांत चावडी वाचनच होत नाही, त्या गावांतील शेतकºयांना  हे कळावे तरी कसे असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.