शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सट्टाबाजाराचा गोंधळात ‘गोंधळ’!

By admin | Updated: October 18, 2014 01:14 IST

वाशिम जिल्ह्यातील निकालाचे गणित मांडताना उमेदवार व कार्यकर्त्यांची दमछाक.

वाशिम : विधानसभा निवडणुकीची धुमश्‍चक्री १५ ऑक्टोबरनंतर शांत झाली असून, कार्यकर्ते मताधिक्याचे आडाखे बांधण्यात मग्न आहेत. कार्यकर्त्यांच्या आकडेमोडीतून मिळणार्‍या दिलाशामुळेच प्रमुख उमेदवारांमध्ये विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या निकराच्या झुंजींमुळे निकालाचे अंदाज वर्तविणे कठीण होऊन बसले आहे. निकालाबाबत सट्टाबाजारही गोंधळलेला आहे.गत १५ ऑक्टोबरला जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड मतदारसंघात विधानसभेची निवडणूक पार पडली. शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीमधील घटस्फोट, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीत झालेली बिघाडी, भारिप-बहुजन महासंघाने राबविलेला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाने पकडलेला वेग आदींमुळे तिन्ही मतदारसंघात ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. परिणामी, निकालांचे आडाखे बांधण्यात मतदार, कार्यकर्ते, तथा राजकीय जाणकारांसह सट्टेबाजारही गोंधळात असल्याचेच दिसून येत आहे. कांरजा मतदारसंघातील बिगफाईटकडे सट्टाबाजाराचे विशेष लक्ष आहे. येथे भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार युसूफ पुंजाणी, भाजपचे राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादीचे सुभाष ठाकरे तथा अपक्ष प्रकाश डहाके यांच्यात लढत झाली. मात्र निवडणूकीनंतर येथील निकालाबाबत सट्टाबाजाराने दररोज नवीन अंदाज व र्तविले आहेत. सट्टाबाजारात कधी एक तर कधी दुसर्‍याच्या भावात चढअतार होत आहे.