शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे नुकसान

By admin | Updated: November 7, 2014 01:12 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती : पाणी असणारे शेतकरीही विद्युतअभावी त्रस्त.

नंदकिशोर नारे /वाशिमयावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. पाऊस येईल, या आशेवर शेतकर्‍यांनी तुरीचे पीक घेतले; मात्र पावसाअभावी तुरीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान संभवत आहे. ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची व्यवस्था नाही, अशा शेतकर्‍यांचे पूर्णपणे पीक सुकले आहे. तर काही ठिकाणी फुले गळून पडत आहेत. जिल्हय़ात सर्वाधिक सोयाबीनचे पीक घेतल्या जाते. त्या तुलनेत तुरीचे पीक कमी असले तरी तेही हातचे जाण्याची भीती शेतकर्‍यांत आहे.जिल्हय़ात आधीच तुरीचे पीक कमी आहे. ज्या शेतकर्‍यांजवळ ओलीताची जमीन आहे ते शेतकरी गहू, हरभरा या पिकाला पसंती देतात. काही शेतकरी तुरीचे पीक घेतात. कोरडवाहू शेतकर्‍यांचे तुरीचे पीक पूर्णपणे सुकण्याच्या मार्गावर असल्याने यावर्षी तुरीच्या उत्पनातसुद्धा घट होणार असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळय़ात प्रमाणापेक्षा कमी पाऊस झाल्याने जमिनीत पिकांना पाहिजे तसा ओलावा नसल्याने पिके नष्ट तर होतच आहेत. एखादा अवकाळी पाऊस झाल्यास तुरीच्या पिकांना जीवनदान मिळाले असते; मात्र तसेही न झाल्याने तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यात जिल्हय़ात कृषी पंपासाठी केवळ २ ते ३ तासच विद्युत पुरवठा होत असल्याने व तोही अत्यंत कमी दाबाचा होत असल्याने रब्बीच्या पिकांचेही नुकसान संभवत आहे. खरिपातील सोयाबीन हातातून गेल्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या शेतकर्‍यांना रब्बी पिकांची आशा होती; पण तीही महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे निराशा झाली आहे.