शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘रानमळा’कडे शेतक-यांसह ग्राहकांनी फिरवली पाठ

By admin | Updated: May 4, 2015 01:31 IST

‘आत्मा’चे नियोजन हुकले

नंदकिशोर नारे /वाशिम : शेतकरीहिताच्या पोकळ गप्पा ठोकणारा जिल्हय़ाचा कृषी विभाग आणि आत्मा प्रकल्पांतर्गत दि. १ मेपासून जिल्हा क्रीडांगणावर सुरू झालेल्या रानमळा महोत्सवात उत्पादक शेतकर्‍यांनी नगण्य सहभाग दर्शविला असून, गहू, टरबूज यासह इतर १ ते २ उत्पादनांवरच अधिक भर दिल्या गेल्याने ग्राहकांनी या महोत्सवात खरेदीला अल्प प्रतिसाद दिला आहे. दि. २ मे रोजी दुपारच्या सुमारास महोत्सवस्थळी शुकशुकाट दिसून आला. कृषी विभाग आणि ह्यआत्माह्णने नियोजनात केलेला कामचलावूपणा यामुळे उघड झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्माच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रानमळाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हा क्रीडा संकुल येथे १ मे रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते ह्यरानमळा २0१५ह्णचे उद्घाटन झाले. याअंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी पिकविलेला शेतमाल, धान्य, डाळी, कडधान्य, फळे, भाजीपाला व इ तर उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे; मात्र या महोत्सवाला भेट देऊन पाहणी केली असता, पेन्डॉलमध्ये गहू, टरबूज, खरबूज, कांदे, बटाटे, टमाटर, आंबे, काही प्रमाणात डाळिंब या शेतकर्‍यांच्या उत् पादनांचे स्टॉल दिसून आले. कृषी विभाग आणि आत्माने आपला भोंगळ कारभार लपविण्यासाठी या महोत्सवात स्टॉलची संख्या वाढविण्यासाठी महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांचा आधार घेतला आहे. यामुळेच शे तमाल, धान्य, डाळी, कडधान्य, फळे, भाजीपाला या स्टॉलच्या तुलनेत लोणचे, पापड, खारोडी, कॉस्मेटिक क्रिम, पाणीपुरी आदी प्रकार ज्यांचा शेतकर्‍यांशी कुठलाही संबंध येत नाही, त्या स्टॉलचा महोत्सवात अधिक भरणा केल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकर्‍यांसोबतच लोकप्रतिनिधी, ग्राहकांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार कृषी विभाग आणि आत्माने अवलंबून शासनाकडून मिळालेल्या निधीचाही अपव्यय केल्याची चर्चा होत आहे. यंदाच्या महोत्सवात जिल्ह्या तील सहाही तालुक्यातून प्रत्येकी पाच शेतकर्‍यांनी आपल्या कृषीमालांची दालने उभारल्याचे सांगून कृषी विभाग व आ त्माने महोत्सवात विक्रीसाठी गहू, डाळी, गूळ, काकडी, कलिंगड, डाळिंब, केळी, भुईमूग शेंग यासह विविध कृषी उत् पादनांचा समावेश केल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात मात्र गूळ, काकडी, कलिंगड, केळी, भूईमुग शेंग आदी प्रकार या महोत्सवात दिसला नाही.