शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

संचारबंदी ‘लॉकडाऊन’; रस्त्यांवर वर्दळ कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:38 IST

वाशिम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीचा पाचवा दिवसही केवळ फार्सच ठरला. बाजारपेठेतील मोजकी दुकाने बंद ...

वाशिम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीचा पाचवा दिवसही केवळ फार्सच ठरला. बाजारपेठेतील मोजकी दुकाने बंद होती, तर वाट्टेल ती कारणे सांगून नागरिक शहरात बिनधोकपणे फिरत आहेत. रस्त्यावर एवढी वर्दळ होती की, कुठे आहे संचारबंदी? असे म्हणण्याची वेळ आली.

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली. ही संचारबंदी १ मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत लागू राहणार असून, जिल्ह्यात संचारबंदीच्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, पहिल्या दिवसापासूनच संचारबंदीला न जुमानता नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे दिसून आले. संचारबंदीच्या पाचव्या दिवशी अर्थात रविवारी वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा येथील प्रमुख रस्त्यांवर वर्दळ दिसून आली. बाजारपेठेतील मोजकी दुकाने बंद होती; तर वाट्टेल ती कारणे सांगून नागरिक शहरात बिनधोकपणे फिरत होते. रस्त्यांवर एवढी वर्दळ होती की, कुठे आहे संचारबंदी असे म्हणण्याची वेळ आली. संचारबंदी जाहीर करताना नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन करण्यात आले होेते; पण त्याउलट परिस्थिती रविवारी सकाळपासून वाशिमसह अन्य शहरांत पाहायला मिळाली. प्रमुख चौकांमधून जाताना कुणीही हटकत नसल्याने, चौकशी करीत नसल्याने नागरिकांचे चांगलेच फावत आहे. सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत शहरातील संचारबंदीची स्थिती पाहण्यासाठी फेरफटका मारताना जणू शहराला संचारबंदीतून सूट दिली आहे की काय, अशी शंका येते.

०००

बॉक्स

मागील दाराने व्यवहार सुरू...

संचारबंदीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, रिसोड, मानोरा, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव, वाशिम, आदी सर्वच प्रमुख शहरांमध्ये मागील दाराने व्यवहार सुरू असल्याचे दिसून येते. हा प्रकार स्थानिक प्रशासनाला माहिती नाही, असे नाही; परंतु, संबंध जोपासण्याच्या नादात याकडे संबंधितांचा कानाडोळा होत असल्याची चर्चा आहे.

००००

बॉक्स

प्रमुख चौकांतून कुणीही या...

वाशिम शहरातील पाटणी चौकाचा अपवाद वगळता उर्वरित कोणत्याही चौकातून कुणीही या आणि कुठेही बिनधास्त फिरा, अशी परिस्थिती गत चार दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. विनामास्क, ट्रिपल सीट वाहनाने सैराट झाली असून, याला आवर कोण घालणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

००००००

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडेही दुर्लक्ष..

राज्य शासनाने संचारबंदी लागू केल्याने वाशिम शहरासह जिल्ह्यात या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासंदर्भात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १५ एप्रिल रोजी आढावा घेतला. संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व यंत्रणांना दिले. वाशिम शहरातील नागरिकांची वर्दळ पाहता, संचारबंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडेही संबंधित यंत्रणांचे होणारे दुर्लक्ष शहरात सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

०००००००००००