शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

बाजारपेठेत उसळली गर्दी; वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

जिल्ह्यात इतर ठिकाणांप्रमाणेच मंगरूळपीर शहरासह तालुक्यातील सर्वच गावांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक ...

जिल्ह्यात इतर ठिकाणांप्रमाणेच मंगरूळपीर शहरासह तालुक्यातील सर्वच गावांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू करून केवळ दवाखाने व मेडिकल्स सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यात २० मेपासून काहीअंशी शिथिलता देत सकाळच्या सुमारास चार तासांच्या कालावधीत किराणा दुकाने, डेअरी, भाजीपाला विक्री यासह इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे; मात्र नागरिकांनी एकाचवेळी बाजारपेठेत गर्दी करू नये, तोंडाला सदोदित मास्कचा वापर करावा, दोन व्यक्तींमध्ये ठराविक अंतर ठेवावे, आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. असे असताना खरेदीसाठी उसळत असलेल्या गर्दीतील प्रत्येकजण नियमांचे उल्लंघन करीत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाला जणू वाकुल्या दाखविण्यात येत आहेत. मास्कचा वापर बहुतांशजण करित आहेत; परंतु सॅनिटायझरच्या वापराकडे दुर्लक्ष केले आहे.

तथापि, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता केवळ प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष केंद्रित न करता नागरिकांनीही स्वत:ची नैतिक जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करावे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास स्वत:हूनच ॲंटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करून उपचार घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. (फोटो १)

.................

बाॅक्स :

पोलीस पथक आल्याशिवाय दुकाने होत नाहीत बंद

जिल्ह्यातील व्यापार हळूहळू पूर्वपदावर यावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंधातून शिथिलता प्रदान करत २० मेपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने, व्यापार सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर दुकानदारांनी स्वत:हूनच साहित्य विक्री बंद करायला हवी; मात्र तसे होत नाही. पोलीस किंवा नगर परिषदेच्या पथकास बाजारपेठेत येऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

..............

बाॅक्स :

विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चाैकशी

साधारणत: दुपारी १२ वाजतानंतर मंगरूळपीर शहरातील सर्व दुकाने बंद होत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट पसरत आहे. त्यानंतर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची पोलिसांकडून कसून चाैकशी केली जात आहे. ज्या व्यक्ती योग्य कारण सांगू शकत नाही, अशांवर दंडात्मक स्वरूपातील कारवाई केली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.