शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या पिकावर रानडुकरांचा डल्ला!

By admin | Updated: November 28, 2015 02:48 IST

वनविभागाने लक्ष देणे गरजेचे; वाशिम जिल्ह्यात ५३९२७ हेक्टरवर तुरीचा पेरा.

नंदकिशोर नारे /वाशिम सद्यस्थितीत तूर पीक फुलावर तर काही ठिकाणी शेंगा धरल्या आहेत. या पिकांवर रानडुकरांनी हल्ला चढविला असून, पिकाचे नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रात्री जागल करुन शेतकरी पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्हय़ात यावर्षी ५३९२७ हेक्टर क्षेत्रावर तुरीच्या पिकांचे क्षेत्र आहे. या पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी रात्रंदिवस जागरण करुन वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना आता रानडुकरांमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान होत आहे. रानडुकरांनी केलेल्या नुकसानाचे कोणत्याच प्रकारची मदत कृषी विभागाकडून केल्या जात नाही. वनविभागाकडून मदत केल्या जात असली तरी अतिशय किचकट पद्धत असल्याने शेतकरी त्या झंझटीत पडताना दिसून येत नाही. मानोरा व कारंजा तालुका वगळता जिल्हय़ातील उर्वरित चार तालुक्यांमध्ये तुरीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक तुरीचा पेरा मंगरुळपीर तालुक्यात असून, या भागात रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. जिल्हय़ात आधिच ढगाळ वातावरणामुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील लाखो हेक्टवरील पिके धोक्यात आली असताना शेतकर्‍यांच्या तुरीला फुले आले तर काही ठिकाणी शेंगा पकडल्यात. या परिस्थितीत वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकर्‍यांच्या पिकातील ओळय़ाच्या ओळय़ा रानडुकरं संपवत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही, याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.