शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

तुरीच्या पिकावर रानडुकरांचा डल्ला!

By admin | Updated: November 28, 2015 02:48 IST

वनविभागाने लक्ष देणे गरजेचे; वाशिम जिल्ह्यात ५३९२७ हेक्टरवर तुरीचा पेरा.

नंदकिशोर नारे /वाशिम सद्यस्थितीत तूर पीक फुलावर तर काही ठिकाणी शेंगा धरल्या आहेत. या पिकांवर रानडुकरांनी हल्ला चढविला असून, पिकाचे नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रात्री जागल करुन शेतकरी पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्हय़ात यावर्षी ५३९२७ हेक्टर क्षेत्रावर तुरीच्या पिकांचे क्षेत्र आहे. या पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी रात्रंदिवस जागरण करुन वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना आता रानडुकरांमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान होत आहे. रानडुकरांनी केलेल्या नुकसानाचे कोणत्याच प्रकारची मदत कृषी विभागाकडून केल्या जात नाही. वनविभागाकडून मदत केल्या जात असली तरी अतिशय किचकट पद्धत असल्याने शेतकरी त्या झंझटीत पडताना दिसून येत नाही. मानोरा व कारंजा तालुका वगळता जिल्हय़ातील उर्वरित चार तालुक्यांमध्ये तुरीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक तुरीचा पेरा मंगरुळपीर तालुक्यात असून, या भागात रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. जिल्हय़ात आधिच ढगाळ वातावरणामुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील लाखो हेक्टवरील पिके धोक्यात आली असताना शेतकर्‍यांच्या तुरीला फुले आले तर काही ठिकाणी शेंगा पकडल्यात. या परिस्थितीत वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकर्‍यांच्या पिकातील ओळय़ाच्या ओळय़ा रानडुकरं संपवत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही, याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.