शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

पावसाअभावी पीक करपले; शेतकऱ्याने फिरवला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST

धनज बु. : गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांची स्थिती वाईट झाली असून, धनज बु. पासूननजीकच ...

धनज बु. : गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांची स्थिती वाईट झाली असून, धनज बु. पासूननजीकच असलेल्या मेहा येथील शेतकऱ्याने पावसाभावी सुकलेल्या सोयाबीन, तूर पिकावर नांगर फिरवला. पावसाने दडी मारल्याने धनज बु. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

जिल्ह्यात गत १५ ते १७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके सुकत चालली आहेत. काही शेतकरी सिंचनाचा आधार घेऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु कोरडवाहू शेती आणि पावसाच्याच भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामधील पिके मात्र हातची जात असल्याचे दिसत असून, अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यात मेहा येथील जयराम कान्होजी गुजर या शेतकऱ्याने आपल्या शेत सर्व्हे क्रमांक १२२ मधील शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी केली होती. सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने या शेतकऱ्याने शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी केली होती. पेरणी केल्यानंतर पीक चांगले बहरलेसुद्धा होते. परंतु पावसाने तब्बल १५ दिवस दडी मारल्याने सोयाबीन व तूर पीक उन्हामुळे पूर्णत: करपल्याने अखेर हतबल होऊन या शेतकऱ्याने या सुकलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. आधीच बियाण्याच्या भावात झालेली भाववाढ त्यात आता दुबार पेरणीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे.

^^^^^^^

पाच एकरात दुबार पेरणीचे संकट

मेहा येथील शेतकरी जयराम गुजर यांनी जूनच्या सुरुवातीला आलेल्या पावसाच्या भरवशावर पाच एकर क्षेत्रात सोयाबीन आणि तूर पिकाची पेरणी केली; परंतु जूनच्या अखेरच्या आठवड्यातील सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. त्यामुळे गुजर यांच्या शेतामधील पीक पूर्णपणे सुकले आणि हे पीक आता पावसानेही सुधारण्याची शक्यता नसल्याने त्यांनी पिकावर नांगरच फिरविला. त्यामुळे पाच एकरात दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर ओढवले असून, आता पेरणीसाठी पैसा आणावा कोठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे.

-----

कोट: जूनच्या सुरुवातीला दमदार पाऊस पडल्याने मी ५ एकर शेतात सोयाबीन व तूर पिकाची पेरणी केली होती. पेरणीनंतर पाऊस चांगला झाल्याने पिकाची स्थिती उत्तम होती; परंतु पावसाने दडी मारल्याने पीक सुकल्याने या पिकावर नांगर फिरवावा लागला. आता दुबार पेरणी कशी करावी, हा मोठा प्रश्न समोर पडला आहे.

- जयराम गुजर,

शेतकरी, मेहा