शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

पीक कर्ज वसुलीचे प्रमाण नगण्य!

By admin | Updated: May 16, 2017 01:51 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा : २०१६-१७ मधील वाटप ८९० कोटी; वसूल झाले २५० कोटी!

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षीच्या खरीप हंगामात जुलै-२०१६ पर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकऱ्यांना ८९० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. मात्र, यंदा शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णत: कोलमडल्याने ही रक्कम वसूल करताना बँकांची चांगलीच कसरत होत आहे. २०१७ चा खरीप हंगाम ऐन तोंडावर आला असताना, ८९० कोटी रुपयांपैकी जेमतेम २५० कोटी रुपयांच्या आसपास रक्कम वसूल झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवार, १५ मे रोजी दिली.गतवर्षीच्या खरीप हंगामात प्रशासनाने ९५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविले होते. त्यापैकी प्रत्यक्षात जुलै २०१६ अखेर जिल्ह्यातील ९८ हजार ७२१ शेतकऱ्यांना ८९० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. ३१ मार्च २०१७ पूर्वी कर्जाची रक्कम अदा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याज सवलत योजनादेखील अंमलात आणल्या गेली. मात्र, २०१६ च्या खरीप हंगामातील सोयाबीनला मिळालेले अल्प दर, नोव्हेंबर २०१६ मध्ये अचानक झालेला नोटाबंदीचा निर्णय आणि रब्बी हंगामात पिकविलेल्या तुरीला तुलनेने मिळालेले अल्प दर व नाफेडने शेतकऱ्यांप्रती अवलंबिलेले उदासीन धोरण, या चक्रव्यूहात फसलेल्या जिल्ह्यातील अधिकांश शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. अशातच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचे रणशिंग फुंकून ‘चांदा ते बांदा’ संघर्ष यात्रा काढली. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने झाली. यामुळे निश्चितपणे कर्जमाफी मिळेल, अशी भाबडी आशा बाळगून असलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी पीक कर्जाची रक्कम अदा करण्यास विलंब केला आहे. त्याचा थेट परिणाम वसुलीवर झाला असून, ८९० कोटींपैकी १५ मे अखेर केवळ २५० कोटी रुपये वसूल करण्यात बँकांना यश मिळाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची वसुली केवळ ३८ टक्के२०१६-१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँक आॅफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक यासह अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले. त्यापैकी एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पीक कर्जाचा आकडा तब्बल ४२४ कोटी रुपये असून, १५ मे अखेरची वसुली मात्र केवळ १६१ कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, २०१६-१७ मधील पीक कर्जाची रक्कम थकबाकीदार शेतकऱ्यांकडून वसूल करण्यासोबतच २०१७-१८ मधील पीक कर्ज वाटपाचे आवाहन बँकेला पेलावे लागत आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवसुलीसाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले. शून्य टक्के व्याज सवलत योजनाही राबविण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांमधून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच वसुलीचे प्रमाण कमी राहिले.- ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा उपनिबंधक, वाशिम