शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

पीकविमा कंपन्या मालामाल; शेतकऱ्यांचे मात्र होताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:41 IST

जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते; मात्र दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. ...

जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते; मात्र दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. त्या संकटातून सावरण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेला बहुतांश शेतकऱ्यांनी पसंती दिली. खरीप २०२०-२१ या हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १०६ कोटी ६३ लाख ७७ हजार ३९ रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे संरक्षित करण्यात आली होती. गेल्यावर्षी जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ७०१ शेतकऱ्यांनी १ लाख ९२ हजार ८२ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. बॅंकांकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यातूनच विमाहप्ता कापण्यात आला. ही रक्कम सुमारे ११ कोटींच्या आसपास आहे. यासह केंद्र व राज्य शासनानेही त्यांच्या हिश्श्याची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली; मात्र १०६ कोटींपेक्षा अधिक रकमेपैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी केवळ साडेदहा कोटींचा मोबदला देण्यात आला.

........................

खरीप २०२०-२१

पीकविमा लागवड क्षेत्र - १,९२,०८२

एकूण जमा रक्कम - १०६.६३ कोटी

एकूण मंजूर पीकविमा - १०.५० कोटी

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे - ११ कोटी

राज्य सरकारने भरलेले पैसे - ६८ कोटी

केंद्र सरकारने भरलेले पैसे - २७ कोटी

.............

विमा काढणारे शेतकरी - २,७१,७०१

आतापर्यंत किती जणांना मिळाला लाभ - ९५,०००

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम - १०.५० कोटी

.............

(बॉक्स)

५० हजारांवर शेतकरी बाद

नैसर्गीक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, यासाठी शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होतात. त्यानुसार, २०२०-२१ मध्ये २ लाख ७१ हजार ७०१ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. त्याचा हप्ताही त्यांच्या कर्जखात्यातून कापण्यात आला; मात्र ५० हजारांवर शेतकरी निकषात बसत नसल्याने बाद झाले आहेत.

...................

विमा भरुनही भरपाई नाही

खरीप हंगामातील पिकांना संरक्षण कवच मिळावे, यासाठी पिकांचा पीक विमा उतरविला होता. पीककर्जातूनच विम्याचा हप्ता कंपनीकडे वळता करण्यात आला. गेल्या हंगामात सोयाबीनला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला; मात्र अद्याप विमाचे संरक्षण मिळालेले नाही.

- राजेश कडू, शेतकरी, खानापूर

.............

गेल्या काही वर्षापासून शेती व्यवसाय धोक्याचा ठरत आहे. विमा हप्ता भरूनही शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास अपेक्षित भरपाई मिळत नाही. यासंदर्भात तक्रार करूनही काहीच फायदा होत नाही. शासनाने विमा भरपाईसंबंधी ठोस धोरण आखून शेतकऱ्यांचे हित जोपासायला हवे.

- प्रदिप इढोळे, शेतकरी, मोतसावंगा

..............

पिकांचा विमा उतरविल्यानंतर नुकसान झाल्यास तत्काळ भरपाई मिळायला हवी; मात्र उभ्या पिकांचे अतोनात नुकसान होऊनही सर्वेक्षण, पंचनाम्यास विलंब लावून भरपाईबाबत प्रचंड दिरंगाई बाळगली जाते. त्यामुळेच पीकविमा ही बाब पूर्णत: तकलादू ठरत आहे. शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांनाच अधिक फायदा होत आहे.

- दिलीप मुठाळ, शेतकरी, चिखली