शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

पीकविमा कंपन्या मालामाल; शेतकऱ्यांचे मात्र होताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:41 IST

जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते; मात्र दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. ...

जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते; मात्र दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. त्या संकटातून सावरण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेला बहुतांश शेतकऱ्यांनी पसंती दिली. खरीप २०२०-२१ या हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १०६ कोटी ६३ लाख ७७ हजार ३९ रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे संरक्षित करण्यात आली होती. गेल्यावर्षी जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ७०१ शेतकऱ्यांनी १ लाख ९२ हजार ८२ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. बॅंकांकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यातूनच विमाहप्ता कापण्यात आला. ही रक्कम सुमारे ११ कोटींच्या आसपास आहे. यासह केंद्र व राज्य शासनानेही त्यांच्या हिश्श्याची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली; मात्र १०६ कोटींपेक्षा अधिक रकमेपैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी केवळ साडेदहा कोटींचा मोबदला देण्यात आला.

........................

खरीप २०२०-२१

पीकविमा लागवड क्षेत्र - १,९२,०८२

एकूण जमा रक्कम - १०६.६३ कोटी

एकूण मंजूर पीकविमा - १०.५० कोटी

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे - ११ कोटी

राज्य सरकारने भरलेले पैसे - ६८ कोटी

केंद्र सरकारने भरलेले पैसे - २७ कोटी

.............

विमा काढणारे शेतकरी - २,७१,७०१

आतापर्यंत किती जणांना मिळाला लाभ - ९५,०००

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम - १०.५० कोटी

.............

(बॉक्स)

५० हजारांवर शेतकरी बाद

नैसर्गीक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, यासाठी शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होतात. त्यानुसार, २०२०-२१ मध्ये २ लाख ७१ हजार ७०१ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. त्याचा हप्ताही त्यांच्या कर्जखात्यातून कापण्यात आला; मात्र ५० हजारांवर शेतकरी निकषात बसत नसल्याने बाद झाले आहेत.

...................

विमा भरुनही भरपाई नाही

खरीप हंगामातील पिकांना संरक्षण कवच मिळावे, यासाठी पिकांचा पीक विमा उतरविला होता. पीककर्जातूनच विम्याचा हप्ता कंपनीकडे वळता करण्यात आला. गेल्या हंगामात सोयाबीनला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला; मात्र अद्याप विमाचे संरक्षण मिळालेले नाही.

- राजेश कडू, शेतकरी, खानापूर

.............

गेल्या काही वर्षापासून शेती व्यवसाय धोक्याचा ठरत आहे. विमा हप्ता भरूनही शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास अपेक्षित भरपाई मिळत नाही. यासंदर्भात तक्रार करूनही काहीच फायदा होत नाही. शासनाने विमा भरपाईसंबंधी ठोस धोरण आखून शेतकऱ्यांचे हित जोपासायला हवे.

- प्रदिप इढोळे, शेतकरी, मोतसावंगा

..............

पिकांचा विमा उतरविल्यानंतर नुकसान झाल्यास तत्काळ भरपाई मिळायला हवी; मात्र उभ्या पिकांचे अतोनात नुकसान होऊनही सर्वेक्षण, पंचनाम्यास विलंब लावून भरपाईबाबत प्रचंड दिरंगाई बाळगली जाते. त्यामुळेच पीकविमा ही बाब पूर्णत: तकलादू ठरत आहे. शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांनाच अधिक फायदा होत आहे.

- दिलीप मुठाळ, शेतकरी, चिखली