शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

जिल्ह्यातील ६४९८ शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:27 IST

केंद्र सरकार, राज्य शासन व शेतकऱ्यांच्या संयुक्तरीत्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आधार दिला जातो. मात्र नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या ...

केंद्र सरकार, राज्य शासन व शेतकऱ्यांच्या संयुक्तरीत्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आधार दिला जातो. मात्र नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हक्काचे कोट्यवधी रुपये हडप करून स्वतःचे खिसे भरणाऱ्या वाशिम व यवतमाळ येथील रिलायन्स व इफको टोकियो विमा कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी खासदार भावना गवळी यांनी दोन्हीही जिल्ह्यांत आंदोलन केले होते. यवतमाळ येथे हजारो शेतकऱ्यांसह ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले होते. सन २०२०-२१ ला नैसर्गिक अवकृपेमुळे सोयाबीन, कपाशी, तूर व इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यानंतर संकटात सापडलेले शेतकरी ऑनलाइन अर्ज दाखल करू शकले नव्हते. तसेच पीकविमा कंपन्यांकडून सर्वेक्षण करणारे सर्वेअर कमी संख्येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण योग्य प्रकारे होत नव्हते. कृषी विभागाने केलेले पीक नुकसानीचे सर्वेक्षण ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने खासदार गवळी यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर गवळी यांच्या पाठपुराव्याला यश येऊन केंद्रीय नैसर्गिक व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे केलेले सर्वेक्षण ग्राह्य धरून नुकसानीच्या पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याबाबतच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले नव्हते मात्र विमा काढला होता तथा कृषी विभागाच्या सर्व्हेमधील यादीमध्ये समाविष्ट असलेल्या तसेच ज्या शेतकऱ्यांनी शेतपिकाचे झालेल्या नुकसानीची पीकविमा रक्कम मिळण्याकरिता उशिरा अर्ज केले अशा शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे, अशी माहिती गवळी यांनी दिली.