शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जिल्ह्यातील पीक पाहणी खोळंबली!

By admin | Updated: July 14, 2017 01:49 IST

शेतकरी चिंताग्रस्त: कृषी सहायकांच्या आंदोलनामुळे अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदा पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पिके संकटात असून, शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्हा स्तरावर कृषी विभागाने ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी पीक पाहणी करण्याचेही ठरवले; परंतु शासनाच्या इतर योजनांची अंमलबजावणी सुरू असतानाच कृषी सहायकांच्या काम बंद आंदोलनामुळे पीक पाहणीच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात यंदा सुरुवातीला जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामच संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात जूनच्या पूर्वाधातच ५० टक्क्यांहून अधिक पेरणी आटोपली, तर सद्यस्थितीत एकूण प्रस्तावित असलेल्या ४ लाख १३ हजार हेक्टरपैकी ३ लाख ५० हजारांहून अधिक क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.तथापि, पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढवले आहे. प्रामुख्याने कारंजा, मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यातील पीकपरिस्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे. जिल्हा कृषी विभागाच्यावतीने याबाबत आढावा घेण्यासाठी पीक पाहणी कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. कोठे दुबार पेरणीचे संकट आहे, कोण्या भागात पिकाची परिस्थिती गंभीर आहे, याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि नुकसान टाळणे हा कृषी विभागाचा उद्देश होता. त्याबाबत तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. तथापि, कृषी विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ असल्याने आधीच अनेक अडचणी असताना आता त्यात कृषी विभागाच्या आंदोलनाचीही भर पडली आहे. राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. यामुळे कृषी सहायकांवर मोठा अन्याय होणार आहे. तो होऊ नये यासाठी जिल्ह्यातील कृषी सहायकांनी मागील दीड महिन्यांपासून विविध टप्प्यांत आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कृषी सहायकांना नाइलाजास्तव काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता मागील तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू असल्याने कृषी विभागाच्या विविध कामांवर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण आणि पीक परिस्थितीची माहिती घेतली असता कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात पावसाअभावी जवळपास ३० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे कळले. कृषी विभागाकडून याबाबत अधिक आणि अचूक माहिती घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत; परंतु आवश्यक मनुष्यबळाअभावी त्यांना निश्चित आकडेवारी मिळणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या माहितीनुसार आम्ही प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरविले आहे; परंतु अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पीक परिस्थितीचा अंदाज घेण्यासह इतर योजनांची अंमलबजावणी कठीण झाली आहे. -दत्तात्रय गावसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.