शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

जिल्ह्यातील पीक पाहणी खोळंबली!

By admin | Updated: July 14, 2017 01:49 IST

शेतकरी चिंताग्रस्त: कृषी सहायकांच्या आंदोलनामुळे अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदा पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पिके संकटात असून, शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्हा स्तरावर कृषी विभागाने ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी पीक पाहणी करण्याचेही ठरवले; परंतु शासनाच्या इतर योजनांची अंमलबजावणी सुरू असतानाच कृषी सहायकांच्या काम बंद आंदोलनामुळे पीक पाहणीच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात यंदा सुरुवातीला जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामच संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात जूनच्या पूर्वाधातच ५० टक्क्यांहून अधिक पेरणी आटोपली, तर सद्यस्थितीत एकूण प्रस्तावित असलेल्या ४ लाख १३ हजार हेक्टरपैकी ३ लाख ५० हजारांहून अधिक क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.तथापि, पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढवले आहे. प्रामुख्याने कारंजा, मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यातील पीकपरिस्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे. जिल्हा कृषी विभागाच्यावतीने याबाबत आढावा घेण्यासाठी पीक पाहणी कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. कोठे दुबार पेरणीचे संकट आहे, कोण्या भागात पिकाची परिस्थिती गंभीर आहे, याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि नुकसान टाळणे हा कृषी विभागाचा उद्देश होता. त्याबाबत तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. तथापि, कृषी विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ असल्याने आधीच अनेक अडचणी असताना आता त्यात कृषी विभागाच्या आंदोलनाचीही भर पडली आहे. राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. यामुळे कृषी सहायकांवर मोठा अन्याय होणार आहे. तो होऊ नये यासाठी जिल्ह्यातील कृषी सहायकांनी मागील दीड महिन्यांपासून विविध टप्प्यांत आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कृषी सहायकांना नाइलाजास्तव काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता मागील तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू असल्याने कृषी विभागाच्या विविध कामांवर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण आणि पीक परिस्थितीची माहिती घेतली असता कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात पावसाअभावी जवळपास ३० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे कळले. कृषी विभागाकडून याबाबत अधिक आणि अचूक माहिती घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत; परंतु आवश्यक मनुष्यबळाअभावी त्यांना निश्चित आकडेवारी मिळणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या माहितीनुसार आम्ही प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरविले आहे; परंतु अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पीक परिस्थितीचा अंदाज घेण्यासह इतर योजनांची अंमलबजावणी कठीण झाली आहे. -दत्तात्रय गावसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.