शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 3, 2016 02:25 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका; पंचनाम्यात दिरंगाई.

वाशिम: वादळवारा व विजांच्या कडकडाटात जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळनंतर जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेकडो हेक्टरवरील भाजीपाला, फळबाग व रब्बी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्हय़ातील १0९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे.२७ फेब्रुवारी रोजी सकाळपासून जिल्हय़ात ढगाळ वातावरण होते, तसेच वातावरणात दमटपणाही वाढला होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील वाशिम, मानोरा, मंगरूळपीर, कारंजा, मालेगाव, रिसोड या सहाही तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. जिल्हय़ातील मालेगाव, रिसोड, मानोरा व कारंजा तालुक्यामध्ये २७, २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी वार्‍यासह पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल संबंधित तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालानुसार रिसोड तालुक्यातील १८६ हेक्टर, मालेगाव ७0, कारंजा ७६0 व मानोरा तालुक्यातील ७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. १ मार्च रोजी सायंकाळनंतर रिसोड, मंगरुळपीर, वाशिम, कारंजा तालुका व अन्यत्र वादळवार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे भाजीपाला, फळबाग व रब्बी हंगामातील गहू, हरभर्‍याचे नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे व सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. काही ठिकाणी दिरंगाई होत असल्याने पीक नुकसानापासून शेतकर्‍यांना वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानोरा तालुक्यातील २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या पाऊस, वादळीवार्‍यासह गारपिटीमुळे ७ गावातील ७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याबाबत तहसीलदार मानोरा यांनी प्राथमिक अहवालानुसार कळविले आहे. गत तीन वर्षांपासून वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर नैसर्गिक संकट कोसळत आहे. पावसाळ्यात फितूर होणे आणि जानेवारी ते मार्च दरम्यान येणार्‍या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.