शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

देश प्रेम घशात नाही, तर कृतीत आणलं पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:32 IST

कारंजा लाड :निसर्ग आपल्याला भरभरुन देतो. त्याचा दातृत्व  गुण आपण आत्मसात करुन दुसर्‍याला देणं शिकलं पाहिजे.  केवळ कोरडा विचार महत्वाचा नसुन तो कृतीत आणनं मह त्वाचे असते. नैसर्गीक आपत्तीच्या वेळी आपण सर्व जण एकत्र  येतो, मात्र एरवी आपण आत्म केंद्री बनुन आपल्या व्यवहारात  मग्न असतो. भारत माझा देश आहे हे कोरडं देश प्रेम केवळ  घशात असुन चालत नाही तर ते कृतीत आणलं पाहिजे असे  भावपूर्ण उदगार सिने अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद  अनासपुरे  यांनी काढले.

ठळक मुद्देशरद व्याख्यानमाला सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड :निसर्ग आपल्याला भरभरुन देतो. त्याचा दातृत्व  गुण आपण आत्मसात करुन दुसर्‍याला देणं शिकलं पाहिजे.  केवळ कोरडा विचार महत्वाचा नसुन तो कृतीत आणनं मह त्वाचे असते. नैसर्गीक आपत्तीच्या वेळी आपण सर्व जण एकत्र  येतो, मात्र एरवी आपण आत्म केंद्री बनुन आपल्या व्यवहारात  मग्न असतो. भारत माझा देश आहे हे कोरडं देश प्रेम केवळ  घशात असुन चालत नाही तर ते कृतीत आणलं पाहिजे असे  भावपूर्ण उदगार सिने अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद  अनासपुरे  यांनी काढले. कारंजा येथे कै.नानासाहेब दहीहांडेकर  प्रांगणात सुरु असलेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ते  बोलत होते.त्याचा विषय होत  नाम करी काम.प्रारंभी सुधाकर जाधव यांनी वक्त्याचे स्वागत केले तर परिचय  रघु वानखडे यांनी केले. आत्महत्याग्रस्त कुटूंबाची सुरु  असलेल्या दैन्यावस्थेविषयी बोलताना ते म्हणाले की, आ पल्याला त्यांच्या वेदनेची  अनुभूती घेता आली पाहिजे, त्यांच्या  वेदनेच्या पातळीवर जावुन आपण त्याच्यासाठी काही तरी केलं  पाहिजे, समाजाला माझं काही तरी देणं आहे. या भावनेतुन  आम्ही नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेने आतमह त्याग्रस्त कुटूंबांच्या सदस्यांना मदतीचा हात देवुन त्यांना स्वालंबी  करण्याचा प्रयत्न सुरु आहे. समाजातील  खरे जननायक आ पल्याला ओळखता आले पाहिजे, बाबा आमटे, प्रकाश आमटे,  रविंद्र कोल्हे ही माणसे खरी नायक आहेत. त्यांचा आदर्श आ पण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आपल्या कृषी संस्कृतीत  दानाला महत्व आहे. शेतकर्‍यांची बायको दिवस निघाल्यापासून  वासुदेवाला दान द्यायची, चिमणीला, दाना टाकायची.मात्र ही  संस्कृती अलिकडे लोप पावत चालली आहे. विदेशी अनुकरण  ही बाब आपल्या जीवनाची घटक बनली आहे. व्हेलेन्टाईन डे ,  रोज डे, चॉकलेट डे, आपण साजरे करतो, कशासाठी? शेतकरी  डे का साजरा करीत नाही! एवढय़ा  महान असलेल्या आपल्या  लोक संस्कृतीचा आपण बम्युर्डा करुन टाकल्याची खंत त्यानी  व्यक्त केली. आपल्या जीवनात नकारात्मकता ठासुन भरली  आहे. आपल्या वर्तनात बदल करायचा असेल तर सकारात्मक  भाव निमाृण करा, निर्थक भांडण करण्यापेक्षा आपसात सुसंवाद  निर्माण करा, निसर्गाप्रती कृतज्ञता भाव ठेवा, आयुष्य खुप कमी  व अधांतरी आहे.त्यामुळे पुढच्या पिढीसाठी आपण काय देवुन  जाणार याचा गांभीर्याने विचार करुन जीवनाला सुंदर बनवा असे  आवाहन केले. सुत्रसंचालन डॉ.रवि ठाकरे यांनी केले आभार  रघु वानखेडे यांनी मानले. डॉ. देशपांडे यांनी शारदा स्तवन  म्हटले.

जगण्याचं सृूत्र शिक्षणातून घेतलं पाहिजे - महाजनकारंजा : शिक्षणातुन माणसाचं व्यक्तीमत्व घडायला पाहिजे.  माणसाच्या प्रकटीकरणाचं माध्यम म्हणजे शिक्षण होय. मात्र आ पण गुणांसाठी  शिक्षण घेत असतो. चांगल कॉलेज मिळावं,  चांगली ब्रँच मिळावी, चांगल प्लेसमेंट मिळावं यासाठी आपली  धडपड सुरु असते. खरं म्हणजे आपण जगण्याचं  सुत्र शिक्षणा तुन घेतलं पाहिजे असे प्रतिपादन  जळगाव येथील दिपस्तंभ  फाउंडेशन संस्थापक यजुर्वेद्र महाजन यांनी केले ते येथील  कै.नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरु असलेल्या शरद व्या ख्यानमालेच्या हरिक महोत्सवी वर्षाचे पहिेले पुष्प गुंफताना ते  बोलत होते.शिक्षण करीअर व व्यक्तीमत्व विकास हा त्यांच्या व्याख्यानाचा  विषय होता.  प्रारंभी  तहसीलदार सचिन पाटील यांनी वक्त्याचे  स्वागत केले तर व्याख्यानमालेच्या ६0 वर्षाचा प्रवास आढावा  प्रमोद दहीहांडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातुन घेतला.वक्तंचा  परिचय परमेश्‍वर व्यवहारे यांनी करुन दिला. श्क्षिण क्षेत्राचं  मुल्यमापन करतांना महाजन पुढे म्हणाले की, आज शिक्षणाचे  प्रमाण खुप वाढले आहे, खरं म्हणजे  शिक्षणाचं प्रमाण वाढलं  तर समस्या कमी व्हायला पाहिजे, मात्र दुर्देवान तसं झालं नाही.  मुलांच्या करीअर मध्ये पालकांच्या वाढत असलेल्या हस्तक्षे पाबद्दल  बोलतांना ते म्हणाले की, सर्व पालक  व्यापारी वृत्तीचे  बनले आहेत. आपल्या मुलाचं श्क्षिण हे भविष्याची गुंतवणुक  म्हणुन ते करीत असतात. त्यामुळे  कधी कधी मुलांना जे जमत  नाही, जे आवडत नाही ते पालकांच्या सक्तीमुळे करावं लागते.   यावेळी त्यांनी दिपस्तंभ या संस्थेतील  अंध, अपंग व अनाथ  मुलांनी आपलं करीअर कसं घडविलं याचे प्रेरणादायी  व्हिडीओ  क्लीप दाखविली. प्रारंभी  दिवंगत झालेले अरुण साधु व  कारंजातील  व्याख्यान मालेशी संबंधीत असलेल्या व्यक्तींना  भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. व्याख्यानमालेचे  ज्येष्ठ कार्यकर्ते   बालकिसन मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला.