शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

रोजगार हमी योजनेतून देशाला दिशा मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

वाशिम : राज्यात १९७१ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना स्थानिकांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी वि. ...

वाशिम : राज्यात १९७१ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना स्थानिकांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी वि. स. पागे यांच्या संकल्पनेतून रोजगार हमी योजना राज्यात अस्तित्वात आली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती मिळाली आहे. या योजनेतून देशाला दिशा मिळाल्याचे मत रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केले.

२१ जुलैरोजी रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि.स. पागे यांच्या जयंतीनिमित्ताने ‘मी समृध्द, गाव समृध्द’ या विषयावरील ऑनलाईन संवाद सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून नंदकुमार वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे बोलत होते. सभेत यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सहभागी होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व रोहयोचे प्रभारी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे उपस्थित होते. नंदकुमार म्हणाले, राज्यातील काही जिल्हयात रोहयोतून चांगले काम झाले आहे. ३५ वर्षांनंतर रोहयो कायदा येऊन तो देशभर लागू झाला आहे. या कायदयाअंतर्गत १०० दिवसांच्या रोहयो कामाची हमी देण्यात आली आहे. राज्यात त्यावेळी पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासोबतच रोजगार निर्मिती करण्याचे आणि स्थानिकांचे स्थलांतर रोखण्याचे काम या योजनेतून करण्यात आले. पोटाची खळगी भरण्यासाठी हा कायदा राज्यात आला. २०२० मध्ये वि. स. पागे असते, तर त्यांनी एक नवीन विचार घेऊन प्रत्येकजण लखपती कसे होतील, याचे नियोजन केले असते. ‘मी समृध्द, गाव समृध्द’चे बारा निकष हे शाश्वत विकासाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००००

कुपोषणमुक्तीसाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक

गावात एकही बालक कुपोषित राहणार नाही, असे सांगून नंदकुमार म्हणाले, कुपोषणमुक्तीसाठी ग्रामस्थांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. महिलांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण तेरापेक्षा जास्त असावे. कोणतेही कुटुंब दारूमुळे उदध्वस्त होणार नाही, यासाठी कोणीही दारू पिणार नाही, याकडे लक्ष दयावे. मुलांना मूलभूत गणित तसेच इंग्रजी बोलता आले पाहिजे. जलसाक्षरता ही काळाची गरज असून, पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही नंदकुमार यांनी सांगितले.