शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेतून देशाला दिशा मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

वाशिम : राज्यात १९७१ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना स्थानिकांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी वि. ...

वाशिम : राज्यात १९७१ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना स्थानिकांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी वि. स. पागे यांच्या संकल्पनेतून रोजगार हमी योजना राज्यात अस्तित्वात आली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती मिळाली आहे. या योजनेतून देशाला दिशा मिळाल्याचे मत रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केले.

२१ जुलैरोजी रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि.स. पागे यांच्या जयंतीनिमित्ताने ‘मी समृध्द, गाव समृध्द’ या विषयावरील ऑनलाईन संवाद सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून नंदकुमार वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे बोलत होते. सभेत यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सहभागी होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व रोहयोचे प्रभारी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे उपस्थित होते. नंदकुमार म्हणाले, राज्यातील काही जिल्हयात रोहयोतून चांगले काम झाले आहे. ३५ वर्षांनंतर रोहयो कायदा येऊन तो देशभर लागू झाला आहे. या कायदयाअंतर्गत १०० दिवसांच्या रोहयो कामाची हमी देण्यात आली आहे. राज्यात त्यावेळी पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासोबतच रोजगार निर्मिती करण्याचे आणि स्थानिकांचे स्थलांतर रोखण्याचे काम या योजनेतून करण्यात आले. पोटाची खळगी भरण्यासाठी हा कायदा राज्यात आला. २०२० मध्ये वि. स. पागे असते, तर त्यांनी एक नवीन विचार घेऊन प्रत्येकजण लखपती कसे होतील, याचे नियोजन केले असते. ‘मी समृध्द, गाव समृध्द’चे बारा निकष हे शाश्वत विकासाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००००

कुपोषणमुक्तीसाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक

गावात एकही बालक कुपोषित राहणार नाही, असे सांगून नंदकुमार म्हणाले, कुपोषणमुक्तीसाठी ग्रामस्थांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. महिलांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण तेरापेक्षा जास्त असावे. कोणतेही कुटुंब दारूमुळे उदध्वस्त होणार नाही, यासाठी कोणीही दारू पिणार नाही, याकडे लक्ष दयावे. मुलांना मूलभूत गणित तसेच इंग्रजी बोलता आले पाहिजे. जलसाक्षरता ही काळाची गरज असून, पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही नंदकुमार यांनी सांगितले.