शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेतून देशाला दिशा मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

वाशिम : राज्यात १९७१ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना स्थानिकांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी वि. ...

वाशिम : राज्यात १९७१ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना स्थानिकांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी वि. स. पागे यांच्या संकल्पनेतून रोजगार हमी योजना राज्यात अस्तित्वात आली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती मिळाली आहे. या योजनेतून देशाला दिशा मिळाल्याचे मत रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केले.

२१ जुलैरोजी रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि.स. पागे यांच्या जयंतीनिमित्ताने ‘मी समृध्द, गाव समृध्द’ या विषयावरील ऑनलाईन संवाद सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून नंदकुमार वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे बोलत होते. सभेत यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सहभागी होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व रोहयोचे प्रभारी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे उपस्थित होते. नंदकुमार म्हणाले, राज्यातील काही जिल्हयात रोहयोतून चांगले काम झाले आहे. ३५ वर्षांनंतर रोहयो कायदा येऊन तो देशभर लागू झाला आहे. या कायदयाअंतर्गत १०० दिवसांच्या रोहयो कामाची हमी देण्यात आली आहे. राज्यात त्यावेळी पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासोबतच रोजगार निर्मिती करण्याचे आणि स्थानिकांचे स्थलांतर रोखण्याचे काम या योजनेतून करण्यात आले. पोटाची खळगी भरण्यासाठी हा कायदा राज्यात आला. २०२० मध्ये वि. स. पागे असते, तर त्यांनी एक नवीन विचार घेऊन प्रत्येकजण लखपती कसे होतील, याचे नियोजन केले असते. ‘मी समृध्द, गाव समृध्द’चे बारा निकष हे शाश्वत विकासाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००००

कुपोषणमुक्तीसाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक

गावात एकही बालक कुपोषित राहणार नाही, असे सांगून नंदकुमार म्हणाले, कुपोषणमुक्तीसाठी ग्रामस्थांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. महिलांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण तेरापेक्षा जास्त असावे. कोणतेही कुटुंब दारूमुळे उदध्वस्त होणार नाही, यासाठी कोणीही दारू पिणार नाही, याकडे लक्ष दयावे. मुलांना मूलभूत गणित तसेच इंग्रजी बोलता आले पाहिजे. जलसाक्षरता ही काळाची गरज असून, पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही नंदकुमार यांनी सांगितले.