शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

रोजगार हमी योजनेतून देशाला दिशा मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

वाशिम : राज्यात १९७१ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना स्थानिकांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी वि. ...

वाशिम : राज्यात १९७१ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना स्थानिकांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी वि. स. पागे यांच्या संकल्पनेतून रोजगार हमी योजना राज्यात अस्तित्वात आली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती मिळाली आहे. या योजनेतून देशाला दिशा मिळाल्याचे मत रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केले.

२१ जुलैरोजी रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि.स. पागे यांच्या जयंतीनिमित्ताने ‘मी समृध्द, गाव समृध्द’ या विषयावरील ऑनलाईन संवाद सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून नंदकुमार वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे बोलत होते. सभेत यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सहभागी होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व रोहयोचे प्रभारी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे उपस्थित होते. नंदकुमार म्हणाले, राज्यातील काही जिल्हयात रोहयोतून चांगले काम झाले आहे. ३५ वर्षांनंतर रोहयो कायदा येऊन तो देशभर लागू झाला आहे. या कायदयाअंतर्गत १०० दिवसांच्या रोहयो कामाची हमी देण्यात आली आहे. राज्यात त्यावेळी पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासोबतच रोजगार निर्मिती करण्याचे आणि स्थानिकांचे स्थलांतर रोखण्याचे काम या योजनेतून करण्यात आले. पोटाची खळगी भरण्यासाठी हा कायदा राज्यात आला. २०२० मध्ये वि. स. पागे असते, तर त्यांनी एक नवीन विचार घेऊन प्रत्येकजण लखपती कसे होतील, याचे नियोजन केले असते. ‘मी समृध्द, गाव समृध्द’चे बारा निकष हे शाश्वत विकासाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००००

कुपोषणमुक्तीसाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक

गावात एकही बालक कुपोषित राहणार नाही, असे सांगून नंदकुमार म्हणाले, कुपोषणमुक्तीसाठी ग्रामस्थांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. महिलांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण तेरापेक्षा जास्त असावे. कोणतेही कुटुंब दारूमुळे उदध्वस्त होणार नाही, यासाठी कोणीही दारू पिणार नाही, याकडे लक्ष दयावे. मुलांना मूलभूत गणित तसेच इंग्रजी बोलता आले पाहिजे. जलसाक्षरता ही काळाची गरज असून, पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही नंदकुमार यांनी सांगितले.