शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी मातीमोल भावात

By admin | Updated: November 9, 2014 01:12 IST

जिल्हय़ात कापसाचा पेरा नगण्य : वाशिम, रिसोड व मानोरा तालुक्यात कापसाचा पेरा अत्यल्प.

नंदकिशोर नारे / वाशिम

      अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांची वाट लागल्यानंतर शेतकर्‍यांच्या आशा तूर आणि कापूस पिकांवर आहेत. अनेक शेतकर्‍यांनी जेमतेम उत्पादन झालेल्या कापसाची वेचणीही उरकली; कापसाच्या शासकीय खरेदीला वेळ असल्याने व्यापार्‍याच्या दारात शेतकरी कापूस मातीमोल भावात विकत आहे. कापसाचे उत्पादन आधीच कमी असताना खासगी बाजारात कापसाला प्रती क्विंटल चार हजारांच्या आतच भाव मिळत असल्याने आर्थिक विंवचनेत सापडलेले शेतकरी कापसाच्या शासकीय खरेदीची आतुरतेने प्रतीक्षा क रीत आहेत. गतवर्षी अतवृष्टीने अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना यंदा अपुर्‍या पावसाने फटका बसला. मूग, उडीद ही पिके दिसलीच नाही, तर सोयाबीनचे उत्पादनही खर्व भरून काढू शकले नाही. मानोरा तालुक्यात यंदा दुबार, तिबार पेरणीच्या संकटाचा सामना करणार्‍या अनेक शेतकर्‍यांनी मूग, उडीद पिकांची वेळ निघून गेल्याने सोयाबीन, तूर आणि कपाशीचा आधार घेतला होता. त्यातच पावसाअभावी सोयाबीननंतर कपाशीच्या उत्पादनातही कमालीची घट आली. सोयाबीनचे एकरी क्विंटल उत्पादनही न झाल्यामुळे अनेक शेतकर्‍यांवर रडण्याचीच वेळ आली. कपाशीचे उत्पादनही घटले आणि त्यातच व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना कापसाचा चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अवर्षणामुळे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीनच्या विक्रीत पेरणीचा खर्चही निघाला नाही आणि आता कापसाचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणात नाही आणि बाजारपेठेत भावही नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कापसाच्या शासकीय खरेदीची प्रतीक्षा करीत आहेत. शासनाने कापसाच्या खरेदीची सुरुवात करून चांगले भाव द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. शासनाकडून कापसाचे हमीभाव प्रती क्विंटल ४ हजार ३६0 रुपये निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यातच शासकीय कापूस संकलन केंद्रावर कापसाची विक्री केल्यास शेतकर्‍यांना टप्प्याटप्प्याने त्याचा चुकारा मिळतो; परंतु शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठही मिळते. सद्यस्थितीत कापसाची शासकीय खरेदी सुरू झालेली नाही. त्यातच सोयाबीनच्या विक्रीतून पेरणीचा खर्चही वसूल न झाल्यामुळे शेतकर्‍यांना नाइलाजास्तव व्यापार्‍यांकडेच कापसाची विक्री करावी लागत आहे. मंगरूळपीर व मानोरा येथेच केवळ व्यापार्‍याकडून कापसाची खरेदी होत असून, मानोरा व मंगरूळपीर येथे ५५0 क्विंटलच्या जवळपास कापसाची खरेदी करण्यात आली आहे.