शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

कापूस खरेदी मातीमोल भावात

By admin | Updated: November 9, 2014 01:12 IST

जिल्हय़ात कापसाचा पेरा नगण्य : वाशिम, रिसोड व मानोरा तालुक्यात कापसाचा पेरा अत्यल्प.

नंदकिशोर नारे / वाशिम

      अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांची वाट लागल्यानंतर शेतकर्‍यांच्या आशा तूर आणि कापूस पिकांवर आहेत. अनेक शेतकर्‍यांनी जेमतेम उत्पादन झालेल्या कापसाची वेचणीही उरकली; कापसाच्या शासकीय खरेदीला वेळ असल्याने व्यापार्‍याच्या दारात शेतकरी कापूस मातीमोल भावात विकत आहे. कापसाचे उत्पादन आधीच कमी असताना खासगी बाजारात कापसाला प्रती क्विंटल चार हजारांच्या आतच भाव मिळत असल्याने आर्थिक विंवचनेत सापडलेले शेतकरी कापसाच्या शासकीय खरेदीची आतुरतेने प्रतीक्षा क रीत आहेत. गतवर्षी अतवृष्टीने अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना यंदा अपुर्‍या पावसाने फटका बसला. मूग, उडीद ही पिके दिसलीच नाही, तर सोयाबीनचे उत्पादनही खर्व भरून काढू शकले नाही. मानोरा तालुक्यात यंदा दुबार, तिबार पेरणीच्या संकटाचा सामना करणार्‍या अनेक शेतकर्‍यांनी मूग, उडीद पिकांची वेळ निघून गेल्याने सोयाबीन, तूर आणि कपाशीचा आधार घेतला होता. त्यातच पावसाअभावी सोयाबीननंतर कपाशीच्या उत्पादनातही कमालीची घट आली. सोयाबीनचे एकरी क्विंटल उत्पादनही न झाल्यामुळे अनेक शेतकर्‍यांवर रडण्याचीच वेळ आली. कपाशीचे उत्पादनही घटले आणि त्यातच व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना कापसाचा चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अवर्षणामुळे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीनच्या विक्रीत पेरणीचा खर्चही निघाला नाही आणि आता कापसाचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणात नाही आणि बाजारपेठेत भावही नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कापसाच्या शासकीय खरेदीची प्रतीक्षा करीत आहेत. शासनाने कापसाच्या खरेदीची सुरुवात करून चांगले भाव द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. शासनाकडून कापसाचे हमीभाव प्रती क्विंटल ४ हजार ३६0 रुपये निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यातच शासकीय कापूस संकलन केंद्रावर कापसाची विक्री केल्यास शेतकर्‍यांना टप्प्याटप्प्याने त्याचा चुकारा मिळतो; परंतु शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठही मिळते. सद्यस्थितीत कापसाची शासकीय खरेदी सुरू झालेली नाही. त्यातच सोयाबीनच्या विक्रीतून पेरणीचा खर्चही वसूल न झाल्यामुळे शेतकर्‍यांना नाइलाजास्तव व्यापार्‍यांकडेच कापसाची विक्री करावी लागत आहे. मंगरूळपीर व मानोरा येथेच केवळ व्यापार्‍याकडून कापसाची खरेदी होत असून, मानोरा व मंगरूळपीर येथे ५५0 क्विंटलच्या जवळपास कापसाची खरेदी करण्यात आली आहे.