शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

CoronaVirus : मुंबई, पुण्याहून परतलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 19:01 IST

दरदिवशी महानगरातून अनेक कामगार गावी परत येत असताना ही समस्या वाढतच आहे.

लोकमत न्युज नेटवर्ककोलार (वाशिम) :मुंबई, पुणेसारख्या महानगरात रोजगारासाठी गेलेले कामगार गावी परत येत आहे. या कामगारांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा आरोग्य विभाग त्यांची तपासणी करून १५ दिवस होम क्वारंटिनचा सल्ला देत आहे. यामुळे संबंधित कामगारांना काम करणे कठीण झाल्याने त्यांच्या उपासमारीची पाळी येत असल्याचे चित्र कोलार परिसरात पाहायला मिळत आहे.मानोरा तालुक्यातील कोलार, हळदा, गिरोली, जगदंबा नगरसह इतर गावातील शेकडो कामगार रोजगारासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरात गेले होते. आता कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रात वाढत असल्याने हे कामगार जिवाच्या भीतीने गावी परत येत आहेत. या कामगारांत एखाद्यालही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असल्यास इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. या पृष्ठभुमीवर प्रशासन त्याची माहिती घेऊन तपासणी करीत आहे. ही तपासणी केल्यानंतर संबंधित कामगारांना १५ दिवस होम क्वारंटिनमध्ये राहण्याचा अर्थात १५ दिवस घरीच थांबून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. जिल्हाभरातील नागरिकांच्या जिवाचा विचार करता ही बाब योग्य आहे. तथापि, हे सर्व कामगार मोलमजुरी करून पोट भरणारे आहेत. त्यामुळे १५ दिवस घरात थांबावे लागत असेल, तर काम कोण करणार आणि कुटुंबाचे उदरभरण कसे करणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दरदिवशी महानगरातून अनेक कामगार गावी परत येत असताना ही समस्या वाढतच आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आल्याचे चित्र कोलार परिसरात पाहायला मिळत आहे.-----------------कोट: आम्ही रोजगारासाठी मुंबई येथे गेलो होतो. परत गावी आल्यानंतर आोग्य विभागाने तपासणी करून १५ दिवस घराबाहेर न निघण्याचा सल्ला दिला; परंतु आमचे उदरभरण मोलमजुरीवर असल्याने काम करणे आवश्यक आहे. आता घराबाहेर न पडता काम कसे करावे आणि कुटुंबाचे पोषण कसे करावे, हा प्रश्न पडला आहे. शासनाने मोफत रेशन धान्य द्यावे आणि काही रक्कम खात्यात जमा करावी.-मंगेश ताकतोडे,कामगार, कोलार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम