शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

CoronaVirus : मुंबई, पुण्याहून परतलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 19:01 IST

दरदिवशी महानगरातून अनेक कामगार गावी परत येत असताना ही समस्या वाढतच आहे.

लोकमत न्युज नेटवर्ककोलार (वाशिम) :मुंबई, पुणेसारख्या महानगरात रोजगारासाठी गेलेले कामगार गावी परत येत आहे. या कामगारांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा आरोग्य विभाग त्यांची तपासणी करून १५ दिवस होम क्वारंटिनचा सल्ला देत आहे. यामुळे संबंधित कामगारांना काम करणे कठीण झाल्याने त्यांच्या उपासमारीची पाळी येत असल्याचे चित्र कोलार परिसरात पाहायला मिळत आहे.मानोरा तालुक्यातील कोलार, हळदा, गिरोली, जगदंबा नगरसह इतर गावातील शेकडो कामगार रोजगारासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरात गेले होते. आता कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रात वाढत असल्याने हे कामगार जिवाच्या भीतीने गावी परत येत आहेत. या कामगारांत एखाद्यालही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असल्यास इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. या पृष्ठभुमीवर प्रशासन त्याची माहिती घेऊन तपासणी करीत आहे. ही तपासणी केल्यानंतर संबंधित कामगारांना १५ दिवस होम क्वारंटिनमध्ये राहण्याचा अर्थात १५ दिवस घरीच थांबून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. जिल्हाभरातील नागरिकांच्या जिवाचा विचार करता ही बाब योग्य आहे. तथापि, हे सर्व कामगार मोलमजुरी करून पोट भरणारे आहेत. त्यामुळे १५ दिवस घरात थांबावे लागत असेल, तर काम कोण करणार आणि कुटुंबाचे उदरभरण कसे करणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दरदिवशी महानगरातून अनेक कामगार गावी परत येत असताना ही समस्या वाढतच आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आल्याचे चित्र कोलार परिसरात पाहायला मिळत आहे.-----------------कोट: आम्ही रोजगारासाठी मुंबई येथे गेलो होतो. परत गावी आल्यानंतर आोग्य विभागाने तपासणी करून १५ दिवस घराबाहेर न निघण्याचा सल्ला दिला; परंतु आमचे उदरभरण मोलमजुरीवर असल्याने काम करणे आवश्यक आहे. आता घराबाहेर न पडता काम कसे करावे आणि कुटुंबाचे पोषण कसे करावे, हा प्रश्न पडला आहे. शासनाने मोफत रेशन धान्य द्यावे आणि काही रक्कम खात्यात जमा करावी.-मंगेश ताकतोडे,कामगार, कोलार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम