शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

CoronaVirus : मुंबई, पुण्याहून परतलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 19:01 IST

दरदिवशी महानगरातून अनेक कामगार गावी परत येत असताना ही समस्या वाढतच आहे.

लोकमत न्युज नेटवर्ककोलार (वाशिम) :मुंबई, पुणेसारख्या महानगरात रोजगारासाठी गेलेले कामगार गावी परत येत आहे. या कामगारांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा आरोग्य विभाग त्यांची तपासणी करून १५ दिवस होम क्वारंटिनचा सल्ला देत आहे. यामुळे संबंधित कामगारांना काम करणे कठीण झाल्याने त्यांच्या उपासमारीची पाळी येत असल्याचे चित्र कोलार परिसरात पाहायला मिळत आहे.मानोरा तालुक्यातील कोलार, हळदा, गिरोली, जगदंबा नगरसह इतर गावातील शेकडो कामगार रोजगारासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरात गेले होते. आता कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रात वाढत असल्याने हे कामगार जिवाच्या भीतीने गावी परत येत आहेत. या कामगारांत एखाद्यालही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असल्यास इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. या पृष्ठभुमीवर प्रशासन त्याची माहिती घेऊन तपासणी करीत आहे. ही तपासणी केल्यानंतर संबंधित कामगारांना १५ दिवस होम क्वारंटिनमध्ये राहण्याचा अर्थात १५ दिवस घरीच थांबून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. जिल्हाभरातील नागरिकांच्या जिवाचा विचार करता ही बाब योग्य आहे. तथापि, हे सर्व कामगार मोलमजुरी करून पोट भरणारे आहेत. त्यामुळे १५ दिवस घरात थांबावे लागत असेल, तर काम कोण करणार आणि कुटुंबाचे उदरभरण कसे करणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दरदिवशी महानगरातून अनेक कामगार गावी परत येत असताना ही समस्या वाढतच आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आल्याचे चित्र कोलार परिसरात पाहायला मिळत आहे.-----------------कोट: आम्ही रोजगारासाठी मुंबई येथे गेलो होतो. परत गावी आल्यानंतर आोग्य विभागाने तपासणी करून १५ दिवस घराबाहेर न निघण्याचा सल्ला दिला; परंतु आमचे उदरभरण मोलमजुरीवर असल्याने काम करणे आवश्यक आहे. आता घराबाहेर न पडता काम कसे करावे आणि कुटुंबाचे पोषण कसे करावे, हा प्रश्न पडला आहे. शासनाने मोफत रेशन धान्य द्यावे आणि काही रक्कम खात्यात जमा करावी.-मंगेश ताकतोडे,कामगार, कोलार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम