शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

CoronaVirus : मुंबई, पुण्याहून परतलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 19:01 IST

दरदिवशी महानगरातून अनेक कामगार गावी परत येत असताना ही समस्या वाढतच आहे.

लोकमत न्युज नेटवर्ककोलार (वाशिम) :मुंबई, पुणेसारख्या महानगरात रोजगारासाठी गेलेले कामगार गावी परत येत आहे. या कामगारांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा आरोग्य विभाग त्यांची तपासणी करून १५ दिवस होम क्वारंटिनचा सल्ला देत आहे. यामुळे संबंधित कामगारांना काम करणे कठीण झाल्याने त्यांच्या उपासमारीची पाळी येत असल्याचे चित्र कोलार परिसरात पाहायला मिळत आहे.मानोरा तालुक्यातील कोलार, हळदा, गिरोली, जगदंबा नगरसह इतर गावातील शेकडो कामगार रोजगारासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरात गेले होते. आता कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रात वाढत असल्याने हे कामगार जिवाच्या भीतीने गावी परत येत आहेत. या कामगारांत एखाद्यालही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असल्यास इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. या पृष्ठभुमीवर प्रशासन त्याची माहिती घेऊन तपासणी करीत आहे. ही तपासणी केल्यानंतर संबंधित कामगारांना १५ दिवस होम क्वारंटिनमध्ये राहण्याचा अर्थात १५ दिवस घरीच थांबून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. जिल्हाभरातील नागरिकांच्या जिवाचा विचार करता ही बाब योग्य आहे. तथापि, हे सर्व कामगार मोलमजुरी करून पोट भरणारे आहेत. त्यामुळे १५ दिवस घरात थांबावे लागत असेल, तर काम कोण करणार आणि कुटुंबाचे उदरभरण कसे करणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दरदिवशी महानगरातून अनेक कामगार गावी परत येत असताना ही समस्या वाढतच आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आल्याचे चित्र कोलार परिसरात पाहायला मिळत आहे.-----------------कोट: आम्ही रोजगारासाठी मुंबई येथे गेलो होतो. परत गावी आल्यानंतर आोग्य विभागाने तपासणी करून १५ दिवस घराबाहेर न निघण्याचा सल्ला दिला; परंतु आमचे उदरभरण मोलमजुरीवर असल्याने काम करणे आवश्यक आहे. आता घराबाहेर न पडता काम कसे करावे आणि कुटुंबाचे पोषण कसे करावे, हा प्रश्न पडला आहे. शासनाने मोफत रेशन धान्य द्यावे आणि काही रक्कम खात्यात जमा करावी.-मंगेश ताकतोडे,कामगार, कोलार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम