शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

कोरोना संपला आता लस कशाला; नागरिकांची लसीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:44 IST

००००००००००००००००० लसीकरण केंद्रही पडले ओस जिल्ह्यात एकूण १३५ लसीकरण केंद्र सुरू असून. कोरोना संसर्ग नियंत्रणात असताना नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे ...

०००००००००००००००००

लसीकरण केंद्रही पडले ओस

जिल्ह्यात एकूण १३५ लसीकरण केंद्र सुरू असून. कोरोना संसर्ग नियंत्रणात असताना नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे पाठ केली आहे. तासा दोन तासांत केवळ दोन-चार व्यक्ती लस घेण्यासाठी केंद्रावर येत असल्याने दिवसभर लसीकरण केंद्रावर शुकशुकाट दिसत आहे. जिल्हाभरात हे चित्र पाहायला मिळते.

०००००००००००००००००००

लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण वाढणार

लसीकरण केंद्रावर तासा दोन तासांत तीन ते चारच व्यक्ती येतात. प्रत्यक्षात लसीचे व्हायल वापरात घेण्यासाठी लस घेणारे किमान दहा व्यक्ती आवश्यक आहेत. लसीकरण केंद्रावर येणाऱ्यांना त्यासाठीच थांबवून ठेवले जाते; परंतु संख्या वाढत नसल्याने लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.

०००००००००००००

लस न घेणे ठरणार घातक

कोरोनाच्या कहरापासून सुरक्षिततेसाठी लस हाच रामबाण उपाय असून, लस घेणाऱ्यापेक्षा लस न घेणाऱ्यांना मृत्यूचा धोका ११ पट अधिक असल्याचे सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या अमेरिकेतील संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस टोचून घेणे आवश्यक आहे.

०००००००००००००

कोट: गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीकरणाचे प्रमाण घटले आहे. अद्यापही जिल्ह्यात ५ लाख ८२ हजार १३० लोकांनी पहिलाही डोस घेतला नाही. ही बाब निश्चितच गंभीर आहे. आरोग्य विभाग आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत असून, नागरिकांनी कोरोनाकडे दुर्लक्ष न करता लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

- डॉ. मधुकर राठोड

जिल्हा शल्यचिकित्सक

०००००००००००००००००००

लसीकरणाची १६ सप्टेंंबरची स्थिती

उद्दिष्ट -१०,१३,१८०,

पहिला डोस - ४,३१,०५०,

दुसरा डोस- १,९०,७३१,

--------------

०३ सप्टेंबरची स्थिती

उद्दिष्ट -१०,१३,१८०,

पहिला डोस - ४,११,१९०,

दुसरा डोस- १,६६,५२७