शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

आठवडाभरात १२८८ लोकांना कोरोना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST

जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर ८ मार्च २०२१ पर्यंत १०,३७८ लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. ...

जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर ८ मार्च २०२१ पर्यंत १०,३७८ लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यापैकी ८,८७२ लोकांनी कोरोनावर मात केली, तर १६३ लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. कोरोना संसर्गाचे प्रमाण गतवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबरदम्यान मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर कोरोना संसर्ग नियंत्रित होऊ लागला. या वर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीचे चित्र पाहता जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यताही वाटू लागली होती; परंतु जानेवारीच्या मध्यांतरापासून कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला. त्यात गेल्या आठवडाभरात २ मार्च ते ८ मार्चपर्यंत तब्बल १,२८८ लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. कोरोना संसर्गाच्या आकडेवारीचा आलेख पाहता मार्च महिन्यात बाधितांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

---------------------

कारंजा तालुक्याची स्थिती गंभीर

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण सद्य:स्थितीत कारंजा तालुक्यात असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. या तालुक्यात २ मार्च ते ८ मार्च या कालावधीत ४७० लोकांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान आहे. जिल्ह्याच्या आठवडाभरातील एकूण बाधितांपैकी हे प्रमाण जवळपास ४० टक्के आहे. कोरोना संसर्गाचा कहर सुरू असलेल्या लगतच्या अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांशी या तालुक्याचा संबंध अधिक येतो. त्यामुळेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कारंजातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे.

---------------------

चेकपोस्टवरील तपासणी कुचकामी

कारंजा तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्गाची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी या तालुक्याला जोडणाऱ्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसह अकोला जिल्ह्याच्या सीमेवर मिळून पाच चेकपोस्ट सुरू केल्या. या ठिकाणी २ पोलीस आणि २ आरोग्य कर्मचारी २४ तास तैनात राहून परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांतील प्रवाशांची तपासणी करीत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून या चेकपोस्ट सुरू असतानाही कारंजा तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसत आहे.

---------------------

आठवड्यातील कोरोना संसर्गाची स्थिती

दिनांक कोरोनाबाधित

२ मार्च १६६

३ मार्च १२४

४ मार्च १८३

५ मार्च १९०

६ मार्च २४५

७ मार्च २४२

८ मार्च १३८