शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:43 IST

वाशिम : गत दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट असून, या दरम्यान जिल्ह्यात जन्मदरात घट आल्याचे समोर आले आहे. सन २०१९-२० ...

वाशिम : गत दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट असून, या दरम्यान जिल्ह्यात जन्मदरात घट आल्याचे समोर आले आहे. सन २०१९-२० या वर्षात जिल्ह्यात ५३६२ बाळांचे जन्म झाले, तर २०२०-२१ या वर्षात ४,७७१ बाळांचे जन्म झाले असून, १ एप्रिल ते १३ मे २०२१ या कालावधीत केवळ २० बाळांचे जन्म झाले.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पहिल्या लाटेत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या वाढली. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध असल्याने लग्न समारंभावरही मर्यादा आल्या. गर्भवती महिलांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याने अनेक जण पाळणा लांबवत असल्याचेही दिसून येते. जिल्ह्यात सन २०१९-२० या वर्षात ५,३६२ बाळांचे जन्म झाले, तर २०२०-२१ या वर्षात ४,७७१ बाळांचे जन्म झाले असून, १ एप्रिल ते १३ मे, २०२१ या कालावधीत केवळ २० बाळांचे जन्म झाले. दुसरीकडे २०१९-२० या वर्षाच्या तुलनेत २०२०-२१ या वर्षात मृत्यूची संख्या वाढल्याचे दिसून येते. जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ९२ तर २०२०-२१ या वर्षात १६२ मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे.

०००००००

वर्ष जन्म मृत्यू

२०१९ ५,३६२ ९२

२०२० ४,७७१ १६२

२०२१ २० ०८

००००००

लग्नांची संख्या घटली

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. पहिल्या लाटेत लग्नसमारंभाला ५० व्यक्तींची उपस्थिती अशी मर्यादा होती. दुसऱ्या लाटेत आता केवळ २५ व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसमारंभ उरकावा, असे आदेश आहेत. त्यामुळे लग्नांची संख्या घटल्याचे दिसून येते.

००००

जन्मदरात झाली घसरण..

सन २०१९-२० च्या तुलनेत सन २०२०-२१ या वर्षात जन्मदरात घट झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारीवरून दिसून येते. जवळपास ५९१ने जन्मदरात घसरण झाली आहे.

०००