शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोरोनाने हिरावले पाच मुलांचे आई-बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात आले ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात आले आहे. कोरोनाने पाच मुलांचे आई-बाबा हिरावले असून, १५ मुलांच्या आई-बाबांपैकी एका जणाचा मृत्यू झाला आहे. आई-बाबांचे छत्र हरविलेल्या या मुलांसाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हास्तरीय कृती दलावर सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या कृती दलात पोलीस अधीक्षक, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचा समावेश असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कृती दलाचे सदस्य सचिव आहेत. कोरोना संसर्गामुुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या व घरात कुणाचेही छत्र नसलेल्या मुलींची व्यवस्था वाशिम येथील बालगृहात व मुलांची व्यवस्था मानोरा येथील बालगृहात केली जाणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दरमहा मदतही केली जाणार आहे. कोरोनामुळे पालकत्व हिरावून घेतलेल्या बालकांचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी ‘चाइल्ड लाइन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकाची सुविधाही उपलब्ध केली आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही अशा बालकांची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कळवून प्रशासनाला सहकार्य करता येणार आहे.

०००००००००

कोरोनामुळे आई-बाबा हिरावलेल्यांची संख्या ५

मुले -४

मुली - १

०००००००

बॉक्स

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास दरमहा मदत !

दोन्ही पालक किंवा आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाहाय्य केले जाणार आहे.

गरजेनुसार मदत केली जाणार आहे. मुलाचा सांभाळ करण्यास कुणी तयार नसेल तर बालगृहात ठेवले जाणार आहे.

जिल्ह्यात पाच मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तसेच १५ मुलांच्या आई-बाबांपैकी एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे.

०००००००

बॉक्स

या अनाथ मुलांच्या राहण्याची, शिक्षण, आरोग्याची सोय होणार !

कोरोनाने ज्या मुलांचे आई-बाबा हिरावले आहेत आणि नात्यातील इतर कुणी सांभाळ करण्यास तयार नसेल तर अशा मुलांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत बालगृहात ठेवण्यात येणार आहे.

या मुलांच्या आरोग्याची काळजी म्हणून नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावर महिला व बालविकास अधिकाऱ्यांचा वॉच राहणार आहे.

शिक्षणात खंड पडू नये म्हणून अशा मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले जाणार आहे. तसेच या मुलांच्या वडिलांच्या नावावर असलेली संपत्ती ही १८ वर्षांपर्यंत इतर कुणाच्या नावावर होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.

०००००

कोरोनाने पालकत्व हिरावून घेतलेल्या बालकांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत पाच मुलांच्या आई-बाबांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले तसेच १५ मुलांच्या आई-बाबांपैकी एका जणाचा मृत्यू झाला. या बालकांची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे.

- सुभाष राठोड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

००