शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने हिरावले पाच मुलांचे आई-बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात आले ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात आले आहे. कोरोनाने पाच मुलांचे आई-बाबा हिरावले असून, १५ मुलांच्या आई-बाबांपैकी एका जणाचा मृत्यू झाला आहे. आई-बाबांचे छत्र हरविलेल्या या मुलांसाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हास्तरीय कृती दलावर सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या कृती दलात पोलीस अधीक्षक, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचा समावेश असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कृती दलाचे सदस्य सचिव आहेत. कोरोना संसर्गामुुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या व घरात कुणाचेही छत्र नसलेल्या मुलींची व्यवस्था वाशिम येथील बालगृहात व मुलांची व्यवस्था मानोरा येथील बालगृहात केली जाणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दरमहा मदतही केली जाणार आहे. कोरोनामुळे पालकत्व हिरावून घेतलेल्या बालकांचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी ‘चाइल्ड लाइन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकाची सुविधाही उपलब्ध केली आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही अशा बालकांची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कळवून प्रशासनाला सहकार्य करता येणार आहे.

०००००००००

कोरोनामुळे आई-बाबा हिरावलेल्यांची संख्या ५

मुले -४

मुली - १

०००००००

बॉक्स

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास दरमहा मदत !

दोन्ही पालक किंवा आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाहाय्य केले जाणार आहे.

गरजेनुसार मदत केली जाणार आहे. मुलाचा सांभाळ करण्यास कुणी तयार नसेल तर बालगृहात ठेवले जाणार आहे.

जिल्ह्यात पाच मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तसेच १५ मुलांच्या आई-बाबांपैकी एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे.

०००००००

बॉक्स

या अनाथ मुलांच्या राहण्याची, शिक्षण, आरोग्याची सोय होणार !

कोरोनाने ज्या मुलांचे आई-बाबा हिरावले आहेत आणि नात्यातील इतर कुणी सांभाळ करण्यास तयार नसेल तर अशा मुलांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत बालगृहात ठेवण्यात येणार आहे.

या मुलांच्या आरोग्याची काळजी म्हणून नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावर महिला व बालविकास अधिकाऱ्यांचा वॉच राहणार आहे.

शिक्षणात खंड पडू नये म्हणून अशा मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले जाणार आहे. तसेच या मुलांच्या वडिलांच्या नावावर असलेली संपत्ती ही १८ वर्षांपर्यंत इतर कुणाच्या नावावर होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.

०००००

कोरोनाने पालकत्व हिरावून घेतलेल्या बालकांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत पाच मुलांच्या आई-बाबांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले तसेच १५ मुलांच्या आई-बाबांपैकी एका जणाचा मृत्यू झाला. या बालकांची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे.

- सुभाष राठोड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

००