शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोनाच्या संकटातही वाढला पीककर्ज वाटपाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:37 IST

जिल्ह्यात १३० लघू व केवळ ३ मध्यम प्रकल्प आहेत. मोठे प्रकल्प उभे करण्यास कुठलाच वाव नाही. यामुळे सिंचनाची प्रभावी ...

जिल्ह्यात १३० लघू व केवळ ३ मध्यम प्रकल्प आहेत. मोठे प्रकल्प उभे करण्यास कुठलाच वाव नाही. यामुळे सिंचनाची प्रभावी सुविधा नसल्याने फळबागा आणि भाजीपालावर्गीय पिक लागवडीचे प्रमाण तुलनेने खुपच कमी आहे. परिणामी, अधिकांश शेतकऱ्यांची दारोमदार रब्बी आणि खरीप हंगामावरच असते. त्यानुसार, कोरोनाचे संकट ऐरणीवर असतानाही शेतकऱ्यांनी कुठलीही तमा न बाळगता शेत मशागतीची कामे आटोपती घेतली असून बी-बियाणे व खताची जुळवाजुळव करून शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. चालूवर्षी ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होणार असून त्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा राहणार असल्याचे गृहीत धरून कृषी विभागाने त्यापद्धतीने नियोजन केले आहे.

शेतकऱ्यांना पैशांची चणचण भासू नये, यासाठी प्रशासनाने ९०० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडक निर्बंध लादण्यात आले; मात्र बॅंका सुरू ठेवण्यास दुपारी १ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली. बॅंकांनीही कोरोनाविषयक नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केल्याने कोरोनाच्या संकट काळातही पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होऊ शकले.

.....................

गतवर्षीचा वाटप ८१८ कोटींचा

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील थकबाकीदार १.६४ लाख शेतकरी कर्जमुक्त झाले होते. त्यामुळे त्या सर्वांना गतवर्षी नव्याने पीक कर्ज मिळणे शक्य झाले. परिणामी, १६५० कोटींच्या उद्दीष्टापैकी जुलै २०२० अखेर ८१८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले होते.

...............

पाच वर्षांत झालेले पीक कर्ज वाटप

२०१७-१८ : ३१२ कोटी

२०१८-१९ : ३९३ कोटी

२०१९-२० : ४०४ कोटी

२०२०-२१ : ८१८ कोटी

२०२१:२२ : ४७० कोटी