शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

गर्दी टळली तरच कोरोनाला प्रतिबंध शक्य- हृषीकेश मोडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 17:36 IST

जिल्हाभरात प्रशासनाकडून राबविल्या जाताहेत प्रभावी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना आजाराने अल्पावधीतच जगभरातील अनेक शहरे बाधीत झाली. राज्यात या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू असून वाशिम जिल्ह्यातही प्रशासनाने प्रभावी उपाययोजना अंमलात आणल्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद...

कोरोना आजाराचा प्रसार कसा होतो?

कोरोना विषाणूचा आजार व प्रसार मुख्यत्वे खोकल्यातून व शिंकण्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातूनच मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निष्पन्न होत आहे. या आजारात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी गर्दी टाळून योग्य खबरदारी घ्यावी व स्वत:चा तसेच इतरांचाही बचाव करावा. 

काळजी कशी घ्यावी?कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने गर्दी टाळणे आवश्यक आहे. लग्न समारंभ, मरणधरणाचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांमधून होणारी गर्दी किमान काही दिवस टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत:च पुढाकार घ्यावा; अन्यथा कोरोनाला प्रतिबंध करणे शक्य होणार नाही. पानटपºया, चहाची दुकाने, मद्यविक्री बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचे सक्तीने पालन व्हायला हवे.

उपाययोजना कोणत्या आहेत?‘कोरोना’ला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्यात प्रामुख्याने पोहरादेवी, उमरी खु. येथील यात्रा रद्द करण्यात आली. २३ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत ८ मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. कुठेही समारंभ, मेळावे व इतर कार्यक्रमांमुळे गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घेणे, शहरी व ग्रामीण क्षेत्रातील मद्यविक्री १९ मार्चपासून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. महानगरातून वाशिममध्ये येणाºया वाहनांमधील प्रवाशांची ग्रामीण रुग्णालयांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी शासन, प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी देखील गर्दी टाळून स्वत:सोबतच इतरांचाही बचाव करण्यासाठी सतर्क राहायला हवे. काळजी न घेतल्यास कोरोनावर नियंत्रण अशक्य असणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याinterviewमुलाखत