शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी आणि मे महिन्यात कडक निर्बंध लागू असल्याने, बहुतांश नागरिक ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी आणि मे महिन्यात कडक निर्बंध लागू असल्याने, बहुतांश नागरिक घरातच आहेत. विविध आजारांचे रुग्णही घरीच बसलेले आहेत. त्यात कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळल्याचे चित्र आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताने कुणाचाही बळी घेतल्याची नोंद नाही.

दरवर्षी उन्हाळ्याला सुरुवात झाली की, उष्णाघातापासून संरक्षण कसे करावे, याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते. एप्रिल ते मे महिन्यादरम्यान तापमान साधारणत: ३९ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मार्चमध्येच उष्माघात कक्ष तयार करण्यात येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपचार करावे, याबाबत दरवर्षी सूचना देऊन त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. मात्र, यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कडाक्याच्या उन्हातही उष्माघात कक्ष उभारण्यात आल्याचे दिसून येत नाही. कडक निर्बंधामुळे सकाळी ११ वाजतानंतर बाजारपेठ बंद राहत असल्याने बहुतांश नागरिकही घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताने कुणाचा बळी गेल्याची घटना घडली नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मागील वर्षीही २४ मार्चपासून लॉकडाऊन होते. त्यामुळे उन्हाळ्यात बहुतांश नागरिक घरातच होते. गतवर्षीही जिल्ह्यात उष्माघाताने कुणाचाही मृत्यू झाला नसल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. कोरोनापूर्वी उष्माघातापासून बचाव म्हणून सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली जात होती. गत दीड वर्षांपासून कोरोनामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधितांवर उपचार करण्याकामी व्यस्त असल्याचे दिसून येते. उष्माघातासंदर्भात यंदा फारशा उपाययोजना दिसून येत नाहीत. दुपारच्या सुमारास सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो. कोरोनाच्या भीतीने यंदा मे महिन्यात उन्हाचा चटकाच लागला नाही.

००००००००००००००००

ऊन वाढले तरी...

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात साधारणत: ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले होते. मे महिन्यात पहिल्या आठवड्यात ३९ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. त्यानंतर, वातावरणातील बदलामुळे तापमानात चढ-उतार दिसून येत आहेत. ऊन लागल्यानंतरही अनेक जण घरगुती उपचारावर भर देत आहेत. ऊन लागल्यास गूळ खाणे, शेळी किंवा गाईचे दूध अंगाला, तळपायाला लावणे, कांद्याचा रस डोक्याला लावणे असे काही घरगुती उपचार केले जातात.

०००००००

उन्हाळा घरातच!

दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी तर मे महिन्यात कडक निर्बंध लागू आहेत. मेडिकल, दवाखाना, रुग्णवाहिका, अंतिम संस्कार आदी अत्यावश्यक कारणाशिवाय सकाळी ११ वाजतानंतर घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा घरातच जात असल्याने ऊन लागण्याचा फारसा प्रश्न निर्माण झाला नाही. सकाळी ११ वाजतानंतर बाजारपेठ बंद राहत असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो.

०००००००००००

उष्माघातापासून बचाव म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात विशेष व्यवस्था केली जाते. या वर्षी उष्माघाताचा रुग्ण आला नाही. कडक निर्बंध लागू असल्याने नागरिकही घरातच आहेत. उन्हापासून बचाव म्हणून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघाताची लक्षणे आढळून आली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-डॉ.मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम