शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

न उगविणाऱ्या बियाण्यांवरून ‘वादंग’!

By admin | Updated: June 29, 2017 01:24 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा : समाजकल्याणच्या योजना राबविण्याला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मानोरा तालुक्यात महाबीजचे बियाणे न उगविल्यानंतरही, कृषी विभागाच्या चमूने पाहणी केली नसल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत सभागृह दणाणून सोडले. याप्रकरणी चौकशी करून दोन दिवसात नुकसानभरपाई अहवाल सादर करण्याचे निर्देश पीठासीन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सदस्य शांत झाले.जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात २८ जून रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दुपारी १ वाजता सुरू झाली. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख तर मंचावर उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर पाटील गोळे, पानुताई जाधव व यमुना जाधव आदींची उपस्थिती होती. सभेला सुरुवात होताच जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी महाबीज बियाण्याची रिकामी बॅग परिधान करून सभागृहाचे लक्ष वेधून घेत मानोरा तालुक्यातील न उगविलेल्या महाबीजच्या बियाण्याचा मुद्दा उपस्थित केला. मानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी महाबीजचे बियाणे पेरले; मात्र बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. असे असतानाही कृषी विभागाच्या चमूने घटनास्थळाची पाहणी केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी रोकडे यांनी लावून धरली. या मुद्याला अन्य जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दुजोरा दिला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, या मागणीने सभागृह दणाणून सोडले. सदस्यांची मागणी लक्षात घेऊन पीठासीन अधिकारी देशमुख यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश कृषी विकास अधिकाऱ्यांना दिले. दोन दिवसात चौकशी करून नुकसानभरपाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देशमुख यांनी केल्या.जिल्हा परिषद सदस्य विश्वास गोदमले यांनी कंझरा रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नावर ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून गोदमले यांनी सभागृह सोडणे पसंत केले. सन २०१६-१७ या वर्षात समाजकल्याण विभागाच्या काही योजना राबविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या योजना सन २०१७-१८ या वर्षात राबविण्यासाठी सभागृहाने मंजुरी देण्याचा मुद्दा समाजकल्याण विभागाने सभागृहासमोर ठेवला. या मुद्याला सभागृहाने सर्वानुमते संमती दिली. जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर यांनी शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न उपस्थित केले. ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्रणा उभारण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेने निधीची तरतूद करावी, अशी मागणी अमदाबादकर यांनी केली. सभेत जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे, विकास गवळी, सचिन पाटील रोकडे, चक्रधर गोटे, देवेंद्र ताथोड यांच्यासह सदस्यांनी सहभाग नोंदविला. दुपारी १ वाजतापासून सुरू झालेली ही सभा रात्री ७ वाजेपर्यंत चालली.जि.प.तील अस्वच्छतेवर अध्यक्षांचे ‘ताशेरे’स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली जाते. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आवारात, स्वच्छता गृह व पायऱ्यांजवळ अस्वच्छता असल्याने ही बाब विसंगत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मांडला. जिल्हा परिषदेत नियमितपणे साफसफाई झाली पाहिजे, अशा सूचना देशमुख यांनी बांधकाम विभाग व सामान्य प्रशासना विभागाला केल्या. यापुढे ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही अध्यक्षांनी दिला.