शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

चौथ्या दिवशीही जिल्ह्यात संततधार पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

वाशिम: सलग चौथ्या दिवशीही कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस झाला असून, यामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे दिलासा मिळाला, अशा प्रतिक्रिया ...

वाशिम: सलग चौथ्या दिवशीही कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस झाला असून, यामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे दिलासा मिळाला, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

यंदा चार लाख हेक्टरवर खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले. आतापर्यंत ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. यंदा सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. त्याखालोखाल तूर, कपाशी, मूग, उडीद आदी पिकांचा पेरा आहे. गेल्या वर्षीदेखील पेरणीनंतर पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले होते.यंदाही पेरणी आटोपल्यानंतर जवळपास १० ते १२ दिवस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर अधूनमधून पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळत गेली. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकांना चांगलीच संजीवनी मिळत आहे. नदीकाठच्या शेतात पाणी साचत असल्याने काही शेतकऱ्यांना पीक नुकसानीसदेखील सामोरे जावे लागत आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

०००००००

पिकांची वाढ जोमाने होणार !

गत चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकांना संजीवनी मिळाली; यासोबत पिकांची वाढ जोमाने होण्याचा आशावाद शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

००

तालुकापाऊस (मिमी)

वाशिम२४.७०

रिसोड१६.२०

मालेगाव२७.५०

मं.पीर१५.८०

मानोरा१४.००

कारंजा ०५.४०