शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कडक निर्बंधांमुळे घरांचे बांधकाम अर्धवट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली. तसेच जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून कडक निर्बंध लागू ...

वाशिम : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली. तसेच जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले. याचा थेट परिणाम घरांच्या बांधकामावर झाला असून, घरकुलांसह इतरही बांधकामे प्रभावित झाली आहेत.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक कामांशिवाय इतर कामांसाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. तथापि, नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठेत गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ९ ते १५ मेदरम्यान कडक निर्बंध लागू केले. १५ मेपासून २० मेपर्यंत निर्बंधाला मुदतवाढ दिली असून, यामधून किराणा, भाजीपाला, डेअरी, कृषी सेवा केंद्रे आदी सेवांना मुभा मिळाली. दरम्यान, गत एका महिन्यापासून संचारबंदी असल्याने बांधकाम क्षेत्र प्रभावित झाले आहे. कडक निर्बंध आणि संचारबंदीचा थेट परिणाम घरबांधकामावर झाला आहे. संचारबंदीमुळे बांधकाम मजूर घरातच आहेत. वाळू, सिमेंट आणि बांधकाम साहित्य मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे घरबांधणीचे काम पूर्णत: ठप्प झाले आहे. अनेकांनी मार्च-एप्रिल महिन्यांपूर्वी घर बांधण्याचे काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने कामाला गती दिली होती. घरबांधणीचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना बांधकाम साहित्य मिळत नाही. कामगारांनाही काम नसल्याने उपासमारीची वेळ येत आहे.

....

कोट बॉक्स

सुुरुवातीला संचारबंदी आणि आता कडक निर्बंध यामुळे शहरांसह ग्रामीण भागात घरांचे बांधकाम ठप्प झाले आहे. एका महिन्यापासून काम बंद असल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरांचे बांधकाम सुरू केव्हा होणार, याची प्रतीक्षा आहे.

- रमेश देवकर, बांधकाम ठेकेदार

०००००

बांधकाम क्षेत्रात मागील २५ वर्षांपासून कार्यरत आहे. गेल्यावर्षी मार्च ते ऑगस्ट यादरम्यान कोरोनामुळे बांधकाम क्षेत्र प्रभावित होते. यंदा पुन्हा दुसरी लाट असल्याने गत एका महिन्यापासून बांधकाम क्षेत्र प्रभावित आहे. रोजगार नसल्याने घरची चूल कशी पेटवावी, असा प्रश्न आहे.

- अशोक बांगर, बांधकाम कामगार

००००