शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सतत घरात राहिल्याने वाढले मुलांचे वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचे नवे शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. रुग्ण हळूहळू कमी होत गेल्यानंतर चालूवर्षात आधी नववी ...

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचे नवे शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. रुग्ण हळूहळू कमी होत गेल्यानंतर चालूवर्षात आधी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असून मार्च महिन्यात तर बाधितांचा आकडा चांगलाच फुगला आहे. परिणामी, शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेऊन सुरू केलेल्या शाळा पुन्हा बंद केल्या. यासह खबरदारीचा उपाय म्हणून मैदानी खेळांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे मुले अधिकांशवेळ घरातच राहत असून मोबाईल, संगणक अन् टी.व्ही. हेच जणू त्यांचे विश्व बनले आहे. मोकळे खेळायला भेट नसल्यानेच त्यांच्या वजनात वाढ होत असल्याचे बालरोगतज्ज्ञांमधून बोलले जात आहे.

................................

मुलांनी हे करावे

मुलांनी वजन न वाढण्यासाठी काय करावे आणि काय करू नये

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे घरातच राहावे लागणार. अशा स्थितीत मुलांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यायला हवे. रात्री लवकर झोपण्यासोबतच सकाळी लवकर झोपेतून उठावे. शारिरीक हालचाल करण्यासाठी घरासमोरील मोकळ्या जागेत अथवा रस्त्यांवर किमान धावण्याचा सराव करावा, मैदानी खेळ खेळावे. विशेषत: जेवणाची वेळ ठरवूनच ठेवावी. त्याच निर्धारित वेळेला जेवण करावे. मोबाईल अन् टी.व्ही. सतत न पाहता त्याच्या वेळाही निश्चित कराव्या. असे केल्यास वजन नियंत्रणात राहणे शक्य आहे.

..............

मुलांनी हे करू नये

मोबाईल, संगणक आणि टी.व्ही.चा अनावश्यक वापर टाळावा. यामुळे अधिकवेळ बसण्याची गरज भासणार नाही. जंकफूडचे सेवन पूर्णत: टाळायला हवे. जास्तीत जास्त ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. अनेकवेळ एकाच ठिकाणी बसून न राहता घरातल्या घरात अथवा मैदानावर खेळणे वाढवावे. शारिरीक हालचाल सतत करित राहावे.

.................

लॉकडाऊनमुळे मुलांच्या सर्वच वेळापत्रकात अनियमितता आल्यानेच त्यांच्या वजनात वाढ होत आहे. याशिवाय पाणीपुरी, पावभाजी, मॅगी यासारख्या जंगफूडचा प्रमाणापेक्षा अधिक वापर होत आहे. मुले दिवसभर घरीच राहत असल्याने त्यांची झोपण्याची, जेवण करण्याची वेळ निश्चित राहिलेली नाही. यामुळेही मुलांच्या वजनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. राम बाजड

.................

सकाळी लवकर उठणे, शाळेत जाणे आणि दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर जेवण, सायंकाळी मैदानावर जाऊन खेळणे, थकवा आल्यानंतर रात्री आपसूकच लवकर झोपणे आणि पुन्हा सकाळी लवकर उठणे हा मुलांचा दिनक्रम कोरोनामुळे पूर्णत: विस्कळित झालेला आहे. आता मुले घरातच राहत असून सर्वच वेळा अनिश्चित झाल्याने त्यांच्या वजनात वाढ होत आहे.

- डॉ. हरीश बाहेती

...............

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जिवनशैलीत अमुलाग्र बदल झालेला आहे. विशेषत: लहान मुलांच्या शाळा बंद असल्याने त्यांचा दिनक्रमही बदललेला आहे. आॅनलाईन क्लासेससाठी तासन्तास मोबाईल हातात राहत आहे. त्यानंतर संगणक किंवा टी.व्ही.समोर मुले बसत आहेत. या सर्व बाबींचा परिणाम त्यांच्या वजन वाढीवर झालेला आहे.

- डॉ. गजानन मस्के