शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

सतत घरात राहिल्याने वाढले मुलांचे वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचे नवे शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. रुग्ण हळूहळू कमी होत गेल्यानंतर चालूवर्षात आधी नववी ...

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचे नवे शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. रुग्ण हळूहळू कमी होत गेल्यानंतर चालूवर्षात आधी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असून मार्च महिन्यात तर बाधितांचा आकडा चांगलाच फुगला आहे. परिणामी, शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेऊन सुरू केलेल्या शाळा पुन्हा बंद केल्या. यासह खबरदारीचा उपाय म्हणून मैदानी खेळांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे मुले अधिकांशवेळ घरातच राहत असून मोबाईल, संगणक अन् टी.व्ही. हेच जणू त्यांचे विश्व बनले आहे. मोकळे खेळायला भेट नसल्यानेच त्यांच्या वजनात वाढ होत असल्याचे बालरोगतज्ज्ञांमधून बोलले जात आहे.

................................

मुलांनी हे करावे

मुलांनी वजन न वाढण्यासाठी काय करावे आणि काय करू नये

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे घरातच राहावे लागणार. अशा स्थितीत मुलांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यायला हवे. रात्री लवकर झोपण्यासोबतच सकाळी लवकर झोपेतून उठावे. शारिरीक हालचाल करण्यासाठी घरासमोरील मोकळ्या जागेत अथवा रस्त्यांवर किमान धावण्याचा सराव करावा, मैदानी खेळ खेळावे. विशेषत: जेवणाची वेळ ठरवूनच ठेवावी. त्याच निर्धारित वेळेला जेवण करावे. मोबाईल अन् टी.व्ही. सतत न पाहता त्याच्या वेळाही निश्चित कराव्या. असे केल्यास वजन नियंत्रणात राहणे शक्य आहे.

..............

मुलांनी हे करू नये

मोबाईल, संगणक आणि टी.व्ही.चा अनावश्यक वापर टाळावा. यामुळे अधिकवेळ बसण्याची गरज भासणार नाही. जंकफूडचे सेवन पूर्णत: टाळायला हवे. जास्तीत जास्त ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. अनेकवेळ एकाच ठिकाणी बसून न राहता घरातल्या घरात अथवा मैदानावर खेळणे वाढवावे. शारिरीक हालचाल सतत करित राहावे.

.................

लॉकडाऊनमुळे मुलांच्या सर्वच वेळापत्रकात अनियमितता आल्यानेच त्यांच्या वजनात वाढ होत आहे. याशिवाय पाणीपुरी, पावभाजी, मॅगी यासारख्या जंगफूडचा प्रमाणापेक्षा अधिक वापर होत आहे. मुले दिवसभर घरीच राहत असल्याने त्यांची झोपण्याची, जेवण करण्याची वेळ निश्चित राहिलेली नाही. यामुळेही मुलांच्या वजनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. राम बाजड

.................

सकाळी लवकर उठणे, शाळेत जाणे आणि दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर जेवण, सायंकाळी मैदानावर जाऊन खेळणे, थकवा आल्यानंतर रात्री आपसूकच लवकर झोपणे आणि पुन्हा सकाळी लवकर उठणे हा मुलांचा दिनक्रम कोरोनामुळे पूर्णत: विस्कळित झालेला आहे. आता मुले घरातच राहत असून सर्वच वेळा अनिश्चित झाल्याने त्यांच्या वजनात वाढ होत आहे.

- डॉ. हरीश बाहेती

...............

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जिवनशैलीत अमुलाग्र बदल झालेला आहे. विशेषत: लहान मुलांच्या शाळा बंद असल्याने त्यांचा दिनक्रमही बदललेला आहे. आॅनलाईन क्लासेससाठी तासन्तास मोबाईल हातात राहत आहे. त्यानंतर संगणक किंवा टी.व्ही.समोर मुले बसत आहेत. या सर्व बाबींचा परिणाम त्यांच्या वजन वाढीवर झालेला आहे.

- डॉ. गजानन मस्के