शहरं
Join us  
Trending Stories
1
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
2
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
3
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
4
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
5
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
6
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
7
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
8
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
9
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
10
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
11
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
12
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
13
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
14
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
15
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
16
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
17
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
18
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
19
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
20
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट

सतत घरात राहिल्याने वाढले मुलांचे वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचे नवे शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. रुग्ण हळूहळू कमी होत गेल्यानंतर चालूवर्षात आधी नववी ...

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचे नवे शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. रुग्ण हळूहळू कमी होत गेल्यानंतर चालूवर्षात आधी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असून मार्च महिन्यात तर बाधितांचा आकडा चांगलाच फुगला आहे. परिणामी, शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेऊन सुरू केलेल्या शाळा पुन्हा बंद केल्या. यासह खबरदारीचा उपाय म्हणून मैदानी खेळांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे मुले अधिकांशवेळ घरातच राहत असून मोबाईल, संगणक अन् टी.व्ही. हेच जणू त्यांचे विश्व बनले आहे. मोकळे खेळायला भेट नसल्यानेच त्यांच्या वजनात वाढ होत असल्याचे बालरोगतज्ज्ञांमधून बोलले जात आहे.

................................

मुलांनी हे करावे

मुलांनी वजन न वाढण्यासाठी काय करावे आणि काय करू नये

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे घरातच राहावे लागणार. अशा स्थितीत मुलांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यायला हवे. रात्री लवकर झोपण्यासोबतच सकाळी लवकर झोपेतून उठावे. शारिरीक हालचाल करण्यासाठी घरासमोरील मोकळ्या जागेत अथवा रस्त्यांवर किमान धावण्याचा सराव करावा, मैदानी खेळ खेळावे. विशेषत: जेवणाची वेळ ठरवूनच ठेवावी. त्याच निर्धारित वेळेला जेवण करावे. मोबाईल अन् टी.व्ही. सतत न पाहता त्याच्या वेळाही निश्चित कराव्या. असे केल्यास वजन नियंत्रणात राहणे शक्य आहे.

..............

मुलांनी हे करू नये

मोबाईल, संगणक आणि टी.व्ही.चा अनावश्यक वापर टाळावा. यामुळे अधिकवेळ बसण्याची गरज भासणार नाही. जंकफूडचे सेवन पूर्णत: टाळायला हवे. जास्तीत जास्त ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. अनेकवेळ एकाच ठिकाणी बसून न राहता घरातल्या घरात अथवा मैदानावर खेळणे वाढवावे. शारिरीक हालचाल सतत करित राहावे.

.................

लॉकडाऊनमुळे मुलांच्या सर्वच वेळापत्रकात अनियमितता आल्यानेच त्यांच्या वजनात वाढ होत आहे. याशिवाय पाणीपुरी, पावभाजी, मॅगी यासारख्या जंगफूडचा प्रमाणापेक्षा अधिक वापर होत आहे. मुले दिवसभर घरीच राहत असल्याने त्यांची झोपण्याची, जेवण करण्याची वेळ निश्चित राहिलेली नाही. यामुळेही मुलांच्या वजनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. राम बाजड

.................

सकाळी लवकर उठणे, शाळेत जाणे आणि दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर जेवण, सायंकाळी मैदानावर जाऊन खेळणे, थकवा आल्यानंतर रात्री आपसूकच लवकर झोपणे आणि पुन्हा सकाळी लवकर उठणे हा मुलांचा दिनक्रम कोरोनामुळे पूर्णत: विस्कळित झालेला आहे. आता मुले घरातच राहत असून सर्वच वेळा अनिश्चित झाल्याने त्यांच्या वजनात वाढ होत आहे.

- डॉ. हरीश बाहेती

...............

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जिवनशैलीत अमुलाग्र बदल झालेला आहे. विशेषत: लहान मुलांच्या शाळा बंद असल्याने त्यांचा दिनक्रमही बदललेला आहे. आॅनलाईन क्लासेससाठी तासन्तास मोबाईल हातात राहत आहे. त्यानंतर संगणक किंवा टी.व्ही.समोर मुले बसत आहेत. या सर्व बाबींचा परिणाम त्यांच्या वजन वाढीवर झालेला आहे.

- डॉ. गजानन मस्के