शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

सतत घरात राहिल्याने वाढले मुलांचे वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचे नवे शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. रुग्ण हळूहळू कमी होत गेल्यानंतर चालूवर्षात आधी नववी ...

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्यावर्षीचे नवे शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. रुग्ण हळूहळू कमी होत गेल्यानंतर चालूवर्षात आधी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असून मार्च महिन्यात तर बाधितांचा आकडा चांगलाच फुगला आहे. परिणामी, शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेऊन सुरू केलेल्या शाळा पुन्हा बंद केल्या. यासह खबरदारीचा उपाय म्हणून मैदानी खेळांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे मुले अधिकांशवेळ घरातच राहत असून मोबाईल, संगणक अन् टी.व्ही. हेच जणू त्यांचे विश्व बनले आहे. मोकळे खेळायला भेट नसल्यानेच त्यांच्या वजनात वाढ होत असल्याचे बालरोगतज्ज्ञांमधून बोलले जात आहे.

................................

मुलांनी हे करावे

मुलांनी वजन न वाढण्यासाठी काय करावे आणि काय करू नये

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे घरातच राहावे लागणार. अशा स्थितीत मुलांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यायला हवे. रात्री लवकर झोपण्यासोबतच सकाळी लवकर झोपेतून उठावे. शारिरीक हालचाल करण्यासाठी घरासमोरील मोकळ्या जागेत अथवा रस्त्यांवर किमान धावण्याचा सराव करावा, मैदानी खेळ खेळावे. विशेषत: जेवणाची वेळ ठरवूनच ठेवावी. त्याच निर्धारित वेळेला जेवण करावे. मोबाईल अन् टी.व्ही. सतत न पाहता त्याच्या वेळाही निश्चित कराव्या. असे केल्यास वजन नियंत्रणात राहणे शक्य आहे.

..............

मुलांनी हे करू नये

मोबाईल, संगणक आणि टी.व्ही.चा अनावश्यक वापर टाळावा. यामुळे अधिकवेळ बसण्याची गरज भासणार नाही. जंकफूडचे सेवन पूर्णत: टाळायला हवे. जास्तीत जास्त ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. अनेकवेळ एकाच ठिकाणी बसून न राहता घरातल्या घरात अथवा मैदानावर खेळणे वाढवावे. शारिरीक हालचाल सतत करित राहावे.

.................

लॉकडाऊनमुळे मुलांच्या सर्वच वेळापत्रकात अनियमितता आल्यानेच त्यांच्या वजनात वाढ होत आहे. याशिवाय पाणीपुरी, पावभाजी, मॅगी यासारख्या जंगफूडचा प्रमाणापेक्षा अधिक वापर होत आहे. मुले दिवसभर घरीच राहत असल्याने त्यांची झोपण्याची, जेवण करण्याची वेळ निश्चित राहिलेली नाही. यामुळेही मुलांच्या वजनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. राम बाजड

.................

सकाळी लवकर उठणे, शाळेत जाणे आणि दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर जेवण, सायंकाळी मैदानावर जाऊन खेळणे, थकवा आल्यानंतर रात्री आपसूकच लवकर झोपणे आणि पुन्हा सकाळी लवकर उठणे हा मुलांचा दिनक्रम कोरोनामुळे पूर्णत: विस्कळित झालेला आहे. आता मुले घरातच राहत असून सर्वच वेळा अनिश्चित झाल्याने त्यांच्या वजनात वाढ होत आहे.

- डॉ. हरीश बाहेती

...............

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जिवनशैलीत अमुलाग्र बदल झालेला आहे. विशेषत: लहान मुलांच्या शाळा बंद असल्याने त्यांचा दिनक्रमही बदललेला आहे. आॅनलाईन क्लासेससाठी तासन्तास मोबाईल हातात राहत आहे. त्यानंतर संगणक किंवा टी.व्ही.समोर मुले बसत आहेत. या सर्व बाबींचा परिणाम त्यांच्या वजन वाढीवर झालेला आहे.

- डॉ. गजानन मस्के