शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिकांनी टाकल्या माना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:18 IST

वाशिम: जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाची पीक परिस्थिती अंत्यत दयनीय झाली असून, पाण्याअभावी पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. म्हणायला, रविवारी (२.१७ मि.मी.) आणि सोमवारी काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु तो पुरेसा नसल्याने चांगल्या जमिनीवरील पिकांच्या सरासरी उत्पादनात ३0 टक्के, तर हलक्या जमिनींवरील पिकांच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून वर्तविले जात आहेत.

ठळक मुद्देसरासरी उत्पादन घटण्याची शक्यता शासनाचा सर्वेक्षणाला ‘खो’!सोयाबीनची फुलगळ; शेंगाही अपरिपक्व!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाची पीक परिस्थिती अंत्यत दयनीय झाली असून, पाण्याअभावी पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. म्हणायला, रविवारी (२.१७ मि.मी.) आणि सोमवारी काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु तो पुरेसा नसल्याने चांगल्या जमिनीवरील पिकांच्या सरासरी उत्पादनात ३0 टक्के, तर हलक्या जमिनींवरील पिकांच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून वर्तविले जात आहेत.जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून, त्यापैकी यावर्षी ४.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपातील विविध पिकांची पेरणी करण्यात आली. असे असले तरी जून महिन्याच्या प्रारंभी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने त्यानंतर मात्र सतत हुलकावणी दिली. अधूनमधून पाऊस झालाही; परंतु तो सार्वत्रिक स्वरूपातील नाही. त्यामुळे १ जून २0१७ ते १३ ऑगस्ट २0१७ या कालावधीत वार्षिक सरासरीच्या ४१.८१ टक्के पर्जन्यमान होऊनही पिके धोक्यात सापडण्यासोबतच जिल्ह्यातील १२२ पैकी तब्बल ७५ सिंचन प्रकल्प अद्याप कोरडच आहेत. यामुळे नापिकीच्या संकटासह आगामी काळात पाणीटंचाईदेखील भीषण रूप धारण करण्याची शक्यता उद्भवली आहे. 

सोयाबीनची फुलगळ; शेंगाही अपरिपक्व!सध्या शेतांमधील सोयाबीन पिकाला फूल तसेच शेंगा लागल्या आहेत. अशास्थितीत पुरेशा पाण्याची नितांत गरज भासत आहे. मात्र, पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे फुलांची गळती होत असून, सोयाबीनच्या शेंगा अपरिपक्त असताना त्याही पाण्याअभावी गळून पडत आहेत. त्याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर होणार असून, आधीच अडचणीत असलेला शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकरी त्यांचाकडे उपलब्ध असलेल्या थोड्याफार पाण्याचा स्प्रिंकलेरच्या सहाय्याने वापर करून शेत भिजवत आहेत. मात्र, हे पाणीदेखील अधिक काळ पुरणार नसल्याचे चित्र आहे.