शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

पिकांनी टाकल्या माना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:18 IST

वाशिम: जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाची पीक परिस्थिती अंत्यत दयनीय झाली असून, पाण्याअभावी पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. म्हणायला, रविवारी (२.१७ मि.मी.) आणि सोमवारी काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु तो पुरेसा नसल्याने चांगल्या जमिनीवरील पिकांच्या सरासरी उत्पादनात ३0 टक्के, तर हलक्या जमिनींवरील पिकांच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून वर्तविले जात आहेत.

ठळक मुद्देसरासरी उत्पादन घटण्याची शक्यता शासनाचा सर्वेक्षणाला ‘खो’!सोयाबीनची फुलगळ; शेंगाही अपरिपक्व!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाची पीक परिस्थिती अंत्यत दयनीय झाली असून, पाण्याअभावी पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. म्हणायला, रविवारी (२.१७ मि.मी.) आणि सोमवारी काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु तो पुरेसा नसल्याने चांगल्या जमिनीवरील पिकांच्या सरासरी उत्पादनात ३0 टक्के, तर हलक्या जमिनींवरील पिकांच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून वर्तविले जात आहेत.जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून, त्यापैकी यावर्षी ४.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपातील विविध पिकांची पेरणी करण्यात आली. असे असले तरी जून महिन्याच्या प्रारंभी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने त्यानंतर मात्र सतत हुलकावणी दिली. अधूनमधून पाऊस झालाही; परंतु तो सार्वत्रिक स्वरूपातील नाही. त्यामुळे १ जून २0१७ ते १३ ऑगस्ट २0१७ या कालावधीत वार्षिक सरासरीच्या ४१.८१ टक्के पर्जन्यमान होऊनही पिके धोक्यात सापडण्यासोबतच जिल्ह्यातील १२२ पैकी तब्बल ७५ सिंचन प्रकल्प अद्याप कोरडच आहेत. यामुळे नापिकीच्या संकटासह आगामी काळात पाणीटंचाईदेखील भीषण रूप धारण करण्याची शक्यता उद्भवली आहे. 

सोयाबीनची फुलगळ; शेंगाही अपरिपक्व!सध्या शेतांमधील सोयाबीन पिकाला फूल तसेच शेंगा लागल्या आहेत. अशास्थितीत पुरेशा पाण्याची नितांत गरज भासत आहे. मात्र, पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे फुलांची गळती होत असून, सोयाबीनच्या शेंगा अपरिपक्त असताना त्याही पाण्याअभावी गळून पडत आहेत. त्याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर होणार असून, आधीच अडचणीत असलेला शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकरी त्यांचाकडे उपलब्ध असलेल्या थोड्याफार पाण्याचा स्प्रिंकलेरच्या सहाय्याने वापर करून शेत भिजवत आहेत. मात्र, हे पाणीदेखील अधिक काळ पुरणार नसल्याचे चित्र आहे.