शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पिकांनी टाकल्या माना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:18 IST

वाशिम: जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाची पीक परिस्थिती अंत्यत दयनीय झाली असून, पाण्याअभावी पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. म्हणायला, रविवारी (२.१७ मि.मी.) आणि सोमवारी काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु तो पुरेसा नसल्याने चांगल्या जमिनीवरील पिकांच्या सरासरी उत्पादनात ३0 टक्के, तर हलक्या जमिनींवरील पिकांच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून वर्तविले जात आहेत.

ठळक मुद्देसरासरी उत्पादन घटण्याची शक्यता शासनाचा सर्वेक्षणाला ‘खो’!सोयाबीनची फुलगळ; शेंगाही अपरिपक्व!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाची पीक परिस्थिती अंत्यत दयनीय झाली असून, पाण्याअभावी पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. म्हणायला, रविवारी (२.१७ मि.मी.) आणि सोमवारी काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु तो पुरेसा नसल्याने चांगल्या जमिनीवरील पिकांच्या सरासरी उत्पादनात ३0 टक्के, तर हलक्या जमिनींवरील पिकांच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून वर्तविले जात आहेत.जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून, त्यापैकी यावर्षी ४.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपातील विविध पिकांची पेरणी करण्यात आली. असे असले तरी जून महिन्याच्या प्रारंभी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने त्यानंतर मात्र सतत हुलकावणी दिली. अधूनमधून पाऊस झालाही; परंतु तो सार्वत्रिक स्वरूपातील नाही. त्यामुळे १ जून २0१७ ते १३ ऑगस्ट २0१७ या कालावधीत वार्षिक सरासरीच्या ४१.८१ टक्के पर्जन्यमान होऊनही पिके धोक्यात सापडण्यासोबतच जिल्ह्यातील १२२ पैकी तब्बल ७५ सिंचन प्रकल्प अद्याप कोरडच आहेत. यामुळे नापिकीच्या संकटासह आगामी काळात पाणीटंचाईदेखील भीषण रूप धारण करण्याची शक्यता उद्भवली आहे. 

सोयाबीनची फुलगळ; शेंगाही अपरिपक्व!सध्या शेतांमधील सोयाबीन पिकाला फूल तसेच शेंगा लागल्या आहेत. अशास्थितीत पुरेशा पाण्याची नितांत गरज भासत आहे. मात्र, पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे फुलांची गळती होत असून, सोयाबीनच्या शेंगा अपरिपक्त असताना त्याही पाण्याअभावी गळून पडत आहेत. त्याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर होणार असून, आधीच अडचणीत असलेला शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकरी त्यांचाकडे उपलब्ध असलेल्या थोड्याफार पाण्याचा स्प्रिंकलेरच्या सहाय्याने वापर करून शेत भिजवत आहेत. मात्र, हे पाणीदेखील अधिक काळ पुरणार नसल्याचे चित्र आहे.