शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

काॅंग्रेस, शिवसेना, वंचितचं ठरलं; वाशिम बाजार समितीत महायुती!

By संतोष वानखडे | Updated: April 4, 2023 18:01 IST

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अखेर काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) व वंचित बहुजन आघाडीची महायुती ४ एप्रिल रोजी साकारली असून, तशी घोषणाही तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केली.

वाशिम

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अखेर काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) व वंचित बहुजन आघाडीची महायुती ४ एप्रिल रोजी साकारली असून, तशी घोषणाही तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केली.

सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीला विशेष महत्व आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीवर काॅंग्रेसचे दिवंगत नेते स्व. नारायणराव गोटे यांच्या गटाची सर्वाधिक काळ सत्ता होती. बाजार समितीचा विहित कार्यकाळ संपल्यानंतरही कोरोनामुळे निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. आता २८ एप्रिल रोजी बाजार समित्यांची सार्वत्रिक निवडणूक होत असून, यामुळे सहकार क्षेत्रातील राजकारण ढवळून निघत आहे. बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी साकारण्यासाठी स्थानिक नेत्यांनी मतदार, कार्यकर्त्यांची मते विचारात घेत युतीसाठी बोलणी चालविली होती. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काॅंग्रेस, शिवसेना (ठाकरे) व वंचित बहुजन आघाडीची महायुती साकारली असून, ४ एप्रिल रोजी काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर गोटे, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) जिल्हा प्रमुख डाॅ. सुधीर कवर व वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ प्रमुख डाॅ. सिद्धार्थ देवळे यांनी या महायुतीची अधिकृत घोषणा केली. या महायुतीमुळे प्रतिस्पर्धी गटाच्या भूवया उंचावल्या असून, ते महायुतीचे आव्हान कसे पेलतात? याकडे राजकीय क्षेत्रासह सहकार गटाचे लक्ष लागून आहे.‘त्या’ इच्छूक उमेदवारांची गोची?वाशिम बाजार समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, शिवसेनेच्या (ठाकरे) काही इच्छूक उमेदवारांनी महायुतीऐवजी प्रतिस्पर्धी गटाकडून उमेदवारी अर्ज भरले आहेत. आता मंगळवारी (दि.४) काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) व वंचित बहुजन आघाडीची महायुती झाल्याची अधिकृत घोषणा तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केली. त्यामुळे प्रतिस्पर्धी गटाकडून अर्ज भरलेल्या वंचित बहुजन आघाडी, शिवसेनेच्या इच्छूकांची गोची झाल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. पक्षाच्या निर्णयाशी एकनिष्ठ राहायचे की पक्षाच्या निर्णयाला आव्हान देत स्वपक्षीय उमेदवारांशीच दोन हात करायचे? याबाबत इच्छूक उमेदवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.