शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला उतरती कळा!

By admin | Updated: July 12, 2017 01:36 IST

पदाधिकारी-कार्यकर्ते शांत : गतवैभवासाठी झगडावे लागणार!

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कधीकाळी जिल्ह्याच्या राजकारणात क्रमांक एकची भूमिका पार पाडलेल्या काँग्रेस पक्षाला सध्या उतरती कळा लागली असून, पदाधिकारी व कार्यकर्ते शांत आहेत. गतवैभव प्राप्त करण्यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांना मरगळ झटकून कामाला लागावे लागणार आहे. माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, माजी खासदार अनंतराव देशमुख आदी मातब्बर नेत्यांच्या काळात काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस होते. जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगर परिषदा, विविध सहकारी सोसायट्या पक्षाच्या ताब्यात होत्या; मात्र अंतर्गत गटबाजी आणि एकमेकांवर कुरघोडीच्या नादात अनेक ग्रामपंचायती आणि नगर परिषदांमध्ये पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वाशिम जिल्हा परिषद आजही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. वाशिम, कारंजा आणि मानोरा या तीन पंचायत समित्यांमध्येही काँग्रेसचे सभापती विराजमान आहेत; परंतु पक्षाची स्थिती मात्र समाधानकारक नाही. सध्याची बदललेली राजकीय स्थिती आणि भारतीय जनता पक्षाच्या वाढत चाललेल्या ताकदीमुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही पुन्हा एकवेळ काँग्रेस-रा.काँ.ला सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, असे मत राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. दरम्यान, राजकीय क्षेत्रात काँग्रेस सातत्याने पिछाडीवर जात असल्याच्या मुद्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक यांना छेडले असता, आजही ग्रामीण भागातील राजकारणात काँग्रेस नंबर वनच असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्कलनिहाय दौरे केले जाणार असून, पुन्हा एक वेळ काँग्रेस पूर्ण ताकदीने समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तीन नगर परिषदांमध्ये काँग्रेसचे केवळ तीन सदस्य!नोव्हेंबर २०१६ मध्ये वाशिम, कारंजा आणि मंगरूळपीर या तीन नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. वाशिममध्ये दोन आणि मंगरूळपीरात एक अशा केवळ तीन जागांवर काँग्रेस पक्षाला विजय मिळविता आला; कारंजात नगर परिषदेत तर खातेही उघडता आले नाही. वास्तविक पाहता नगर परिषद निवडणुकांमधील या मोठ्या अपयशानंतर पक्षातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेते, विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा दिग्गज पदाधिकाऱ्यांनी खडबडून जागे होत पराभवाची कारणे शोधून त्या दिशेने स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा होता; मात्र गेल्या आठ महिन्यांचा मोठा कालावधी उलटूनही ही मंडळी अद्याप शांत आहे.