शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला उतरती कळा!

By admin | Updated: July 12, 2017 01:36 IST

पदाधिकारी-कार्यकर्ते शांत : गतवैभवासाठी झगडावे लागणार!

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कधीकाळी जिल्ह्याच्या राजकारणात क्रमांक एकची भूमिका पार पाडलेल्या काँग्रेस पक्षाला सध्या उतरती कळा लागली असून, पदाधिकारी व कार्यकर्ते शांत आहेत. गतवैभव प्राप्त करण्यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांना मरगळ झटकून कामाला लागावे लागणार आहे. माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, माजी खासदार अनंतराव देशमुख आदी मातब्बर नेत्यांच्या काळात काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस होते. जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगर परिषदा, विविध सहकारी सोसायट्या पक्षाच्या ताब्यात होत्या; मात्र अंतर्गत गटबाजी आणि एकमेकांवर कुरघोडीच्या नादात अनेक ग्रामपंचायती आणि नगर परिषदांमध्ये पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वाशिम जिल्हा परिषद आजही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. वाशिम, कारंजा आणि मानोरा या तीन पंचायत समित्यांमध्येही काँग्रेसचे सभापती विराजमान आहेत; परंतु पक्षाची स्थिती मात्र समाधानकारक नाही. सध्याची बदललेली राजकीय स्थिती आणि भारतीय जनता पक्षाच्या वाढत चाललेल्या ताकदीमुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही पुन्हा एकवेळ काँग्रेस-रा.काँ.ला सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, असे मत राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. दरम्यान, राजकीय क्षेत्रात काँग्रेस सातत्याने पिछाडीवर जात असल्याच्या मुद्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक यांना छेडले असता, आजही ग्रामीण भागातील राजकारणात काँग्रेस नंबर वनच असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्कलनिहाय दौरे केले जाणार असून, पुन्हा एक वेळ काँग्रेस पूर्ण ताकदीने समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तीन नगर परिषदांमध्ये काँग्रेसचे केवळ तीन सदस्य!नोव्हेंबर २०१६ मध्ये वाशिम, कारंजा आणि मंगरूळपीर या तीन नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. वाशिममध्ये दोन आणि मंगरूळपीरात एक अशा केवळ तीन जागांवर काँग्रेस पक्षाला विजय मिळविता आला; कारंजात नगर परिषदेत तर खातेही उघडता आले नाही. वास्तविक पाहता नगर परिषद निवडणुकांमधील या मोठ्या अपयशानंतर पक्षातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेते, विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा दिग्गज पदाधिकाऱ्यांनी खडबडून जागे होत पराभवाची कारणे शोधून त्या दिशेने स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा होता; मात्र गेल्या आठ महिन्यांचा मोठा कालावधी उलटूनही ही मंडळी अद्याप शांत आहे.