शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

दिव्यांगांसाठीच्या निधीबाबत तक्रारींचा होणार निपटारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:56 IST

दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी पंचायतराज संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून पाच टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पाच ...

दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी पंचायतराज संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून पाच टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पाच टक्के राखीव निधी खर्च करताना शासकीय नियम पाळले जात नाहीत, निधी खर्चाबाबत अनियमितता, अखर्चित निधी आदी स्वरूपातील तक्रारी लाभार्थींमधून प्राप्त होतात. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आता ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक, पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी हे तक्रार निवारण अधिकारी म्हणून तर जिल्हा परिषद स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांच्या पाच टक्के निधीसंबंधी तक्रारीचे निवारण करण्यासंंबंधी अर्ज प्राप्त झाल्याच्या ३० दिवसांत कार्यवाही करावी लागणार आहे. येथे तक्रारकर्त्यांचे समाधान न झाल्यास संबंधितांना ३० दिवसांच्या आत पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकाऱ्यांकडे अपील अर्ज दाखल करता येणार आहे. हीच कार्यवाही पंचायत समिती स्तरावरही राहणार असून, येथे तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्यास ते जिल्हा तक्रार निवारण समितीकडे दाद मागू शकतील. जिल्हा तक्रार निवारण समितीत सदस्य सचिव म्हणून पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर सदस्य म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.