शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

शिक्षणतज्ञांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 20:21 IST

मानोरा : अहमदनगर येथील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रतनवाडी, ज्योतीबानगर, शेंदोणा या गावांना भेट देवुन शिक्षण, गरीबी, व्यसनाधिनता या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची पाहणी केली.

ठळक मुद्देग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : अहमदनगर येथील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रतनवाडी, ज्योतीबानगर, शेंदोणा या गावांना भेट देवुन शिक्षण, गरीबी, व्यसनाधिनता या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची पाहणी केली.शिक्षणाशिवाय गरीबी दूर होणार नाही म्हणून पालक, शिक्षकांनी मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले पाहिजे, शाळेची उपस्थिती वाढवुन शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच शासनाच्या विविध योजना आदिवासी, अनुसुचीत जाती च्या लोकापर्यंत पोहोचल्या पाहिजे,त्यासाठी प्रशासनातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी तत्पर असावे, अनेक गावात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक आठ ते पंधरा दिवस येत नाहीत असे ग्रामस्थांनी सांगितल्यावरुन त्यांनी चिंता व्यक्त केली. येथील जिल्हा परिषदच्या शाळांनाही त्यांनी भेट देवुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.चवथ्या वर्गातील मुलांना जोडाक्षरे, बेरीज, वजाबाकी आली पाहिजे असे त्यांनी शिक्षकांना सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे, घरकुल, शौचालये आदि कामाच्या दर्जा व सुधारणाविषयी त्यांनी चिंता व्यक्त करुन प्रशासनाबाबत चिड व्यक्त केली. महाराष्ट्र बदलतो आहे असे म्हटल्या जाते, मात्र ग्रामीण महाराष्ट्रातील गाव,तांड्यावर विकासाच्या बाबतीत बºयाच सुधारणा होणे बाकी आहे. बंजारा समाजातील बेरोजगारी, व्यसनाधिनता आणि मागासलेपणा त्यांच्या गरीबीस कारणीभूत आहे. उसतोड कामगारांचा प्रश्न असो वा शेतात राबवणाºया मजूरांच्या मजुरीचा प्रश्न कायम आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी काही प्रकल्प राबविले पाहिजे, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आग्रही असावे असेही त्यांनी म्हटले. राज्यातील १०० गावांना भेटी देवुन गरीबी बाबत आपण अहवाल लिहून तो मुख्यमंत्र्यांना सादर करणार असेही त्यांनी सांगितले. त्यांचे सोबत वाशिम येथील विठ्ठल जोशी, सत्यजीत कांबळे, कोल्हे व मानोरा येथील माणिक डेरे, संजय अलदर होते. माजी विज मंडळ सदस्य अनिल राठोड यांच्या निवासस्थानी वाईगौळ येथे जावुन त्यांनी त्यांचेसोबत चर्चा केली.