शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण माहिती संकलित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

वाशिम : कोरोना महामारीमुळे अनेक बालकांना पालक गमावण्याची वेळ आली. अठरा वर्षांच्या आतील अनाथ बालकांना विविध योजनांचा लाभ देण्यासोबत ...

वाशिम : कोरोना महामारीमुळे अनेक बालकांना पालक गमावण्याची वेळ आली. अठरा वर्षांच्या आतील अनाथ बालकांना विविध योजनांचा लाभ देण्यासोबत शेतीच्या सातबारात वारस म्हणून त्यांच्या नावाचा समावेश करून पालकांचा बँकेत असलेल्या पैसा त्यांना मिळाला पाहिजे, यासाठी या बालकांची संपूर्ण माहिती येत्या २० जूनपर्यंत संकलित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन यांनी १४ जून रोजी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात कोरोना प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासोबतच, त्यांचे योग्य संगोपन करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलाची सभा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला समितीचे सदस्य तथा जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी.पी. देशपांडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ.जयश्री गुट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची उपस्थिती होती.

शण्मुगराजन एस. पुढे म्हणाले, कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतीचा मृत्यू झाला आहे, अशा महिलांची माहिती संकलित करून त्यांना निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित तहसीलदारांना प्रस्ताव सादर करावा. ज्या अनाथ बालकांकडे वडिलांची शेती असेल, तर त्या बालकांची शेतीचा वारस म्हणून सातबारावर नोंद घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. मृत्यू पावलेल्या पालकांचा बँकेत असलेला पैसा त्या बालकांना मिळावा, यासाठीही वारस म्हणून त्या बालकांची नोंद घेण्यात यावी. दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना त्यांच्या पालकांच्या नावे असलेली चल व अचल संपत्ती संबंधित बालकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य व सक्षम बालकांच्या पालनपोषणकर्त्या व्यक्तीकडे ठेवण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. सभेला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, चाइल्ड लाइनचे समन्वयक महेश राऊत, संरक्षण अधिकारी सर्वश्री. आलोक अग्रहरी, डी.पी.उचित, आर. एन. सुरजुसे, आर. जी. वानखडे यांची उपस्थिती होती.

००

अंगणवाडीसेविकेमार्फत सर्वेक्षण

कोविड १९ मुळे एक व दोन्ही पालक गमावलेल्या १८ वर्षांच्या आतील बालकांचे सर्वेक्षण अंगणवाडीसेविकेमार्फत करण्यात आले. दोन पालक गमावलेली ५ बालके चार कुटुंबांत, तर एक पालक गमावलेले १८३ बालके ९४ कुटुंबांत आहेत. त्यापैकी ४४ बालकांची गृहभेट घेऊन त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित १३९ बालकांची गृहभेट घेण्यात येत आहे. त्यांनाही बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी सांगितले. आतापर्यंत ५८ बालकांचा सामाजिक अन्वेषण अहवाल चौकशी करून बालकल्याण समितीकडे सादर करण्यात आला.