शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलची कामे थंड बस्त्यात!

By admin | Updated: May 22, 2017 01:21 IST

प्रशासकीय उदासीनता : १० योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी मिळालेला १४ कोटी रुपयांचा निधी पडून

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विविध कारणांमुळे बंद पडलेल्या जिल्ह्यातील १० पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनाकरिता शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर केला; मात्र, १० पैकी आजपर्यंत एकही काम सुरू होऊ शकले नाही. दोन ते तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही कंत्राटदारांकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.शासनाने ३१ डिसेंबर २०१६ च्या अध्यादेशानुसार जिल्ह्यातील करडा २ गावे, उंबर्डा बाजार ९ गावे, म्हसणी १६ गावे आणि वारला ४ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनास मंजुरी प्रदान केली. यासाठी ५ कोटी ३१ लाख ७१ हजार रुपये निधीदेखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला प्राप्त झाला आहे. यासह ९ फेबु्रवारी २०१७ च्या अध्यादेशानुसार, भामदेवी ३ गावे, चांडस ६ गावे, दुबळवेल ६ गावे, जऊळका रेल्वे ३ गावे, वनोजा ४ गावे आणि चिचांबाभर ४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी ८ कोटी ८० लाख २६ हजार ३०० रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला. सदर दहाही योजनांच्या पुनरुज्जीवनाची, पुढील देखभाल-दुरुस्तीची, संचलन व सनियंत्रणाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवर सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार, निविदा प्रक्रिया राबवून कामांना विनाविलंब प्रारंभ करावा, असे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र कंत्राटदारांकडून त्यास कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने कामे सुरू होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता लवकरच पावसाळा सुरू होण्याचे संकेत असल्याने किमान यावर्षी तरी ही कामे सुरू होणार नाहीत, असे दिसून येत आहे. चार योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश!पुनरुज्जीवनासाठी मंजूर १० योजनांपैकी आजपर्यंत वनोजा, वारला, उंबर्डा बाजार आणि म्हसणी या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आला. उर्वरित ६ योजनांची निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे चालू वर्षांत ही कामे सुरू होतील की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डिसेंबर २०१६ मध्ये चार आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये सहा अशा दोन टप्प्यात १० पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार, निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र योजनेंतर्गत देखभाल-दुरुस्तीचा (मेन्टेनन्स) मुद्दा असल्यामुळे कंत्राटदारांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही. - श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अमरावती