शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलची कामे थंड बस्त्यात!

By admin | Updated: May 22, 2017 01:21 IST

प्रशासकीय उदासीनता : १० योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी मिळालेला १४ कोटी रुपयांचा निधी पडून

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विविध कारणांमुळे बंद पडलेल्या जिल्ह्यातील १० पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनाकरिता शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर केला; मात्र, १० पैकी आजपर्यंत एकही काम सुरू होऊ शकले नाही. दोन ते तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही कंत्राटदारांकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.शासनाने ३१ डिसेंबर २०१६ च्या अध्यादेशानुसार जिल्ह्यातील करडा २ गावे, उंबर्डा बाजार ९ गावे, म्हसणी १६ गावे आणि वारला ४ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनास मंजुरी प्रदान केली. यासाठी ५ कोटी ३१ लाख ७१ हजार रुपये निधीदेखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला प्राप्त झाला आहे. यासह ९ फेबु्रवारी २०१७ च्या अध्यादेशानुसार, भामदेवी ३ गावे, चांडस ६ गावे, दुबळवेल ६ गावे, जऊळका रेल्वे ३ गावे, वनोजा ४ गावे आणि चिचांबाभर ४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी ८ कोटी ८० लाख २६ हजार ३०० रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला. सदर दहाही योजनांच्या पुनरुज्जीवनाची, पुढील देखभाल-दुरुस्तीची, संचलन व सनियंत्रणाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवर सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार, निविदा प्रक्रिया राबवून कामांना विनाविलंब प्रारंभ करावा, असे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र कंत्राटदारांकडून त्यास कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने कामे सुरू होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता लवकरच पावसाळा सुरू होण्याचे संकेत असल्याने किमान यावर्षी तरी ही कामे सुरू होणार नाहीत, असे दिसून येत आहे. चार योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश!पुनरुज्जीवनासाठी मंजूर १० योजनांपैकी आजपर्यंत वनोजा, वारला, उंबर्डा बाजार आणि म्हसणी या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आला. उर्वरित ६ योजनांची निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे चालू वर्षांत ही कामे सुरू होतील की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डिसेंबर २०१६ मध्ये चार आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये सहा अशा दोन टप्प्यात १० पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार, निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र योजनेंतर्गत देखभाल-दुरुस्तीचा (मेन्टेनन्स) मुद्दा असल्यामुळे कंत्राटदारांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही. - श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अमरावती