शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कारंजालाड शहरात स्वच्छतेचे ‘वाटोळे’

By admin | Updated: June 21, 2014 00:34 IST

स्वच्छता अभियान राबविण्याची आवश्यकता : घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कारंजालाड : जैनांची काशी, दत्त महाराजांचे जन्मस्थान तसेच शैक्षणिक दर्जा उंचावलेल्या कारंजा शहरामध्ये भाविक दूरदूरून दर्शनासाठी येतात; मात्र नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील खाद्य विक्रीच्या ठिकाणी चौकाचौकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ढिगारे साचले आहे. त्याकरीता पावसाळा सुरु होण्यापूर्वी नाल्यातील साचलेली घाण साफ करावी अशी मागणी शहरातील नागरिकाकडून होत आहे. शहरातील मेन रोडच्या नाल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घाण, काडी कचरा साचल्याने पावसाळ्यात पाणी नालीतून न वाहता बाहेरुन वाहून जाते. त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात घाण साचते. तीच रस्त्यावरील घाण व कचरा पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात साचला आहे. त्यामुळे येणार्‍या पशू पालकांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातील जयस्तंभ चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक, बस स्टॅन्ड, मुलजी जेठा हायस्कूल परिसर, गवळीपुरा आठवडी बाजार टिळक चौक आदी ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहे. तेच ढिग पाउस आला की नालीत जाते. त्यामुळे पाऊस तुटूंब आला की नाल्या भरुण जाते. ते घाणीचे पाणी रस्त्यावर येउन रहदारीला नाहक त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा पाउस थांबला की, घाणीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. शहरात स्वच्छता निर्माण व्हावी याकरीता नगर परिषदने स्वच्छता अभियान राबवावे अशी मागणी आहे.