शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

स्वच्छ महाराष्ट्र अभियान लोकचळवळ व्हावी - राहूल व्दिवेदी

By admin | Updated: May 26, 2017 20:11 IST

मानोरा : येत्या १५ जुनपर्यंत मानोरा नगर पंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त झाली पाहिजे हे शक्य आहे. फक्त ही लोकचळवळ झाली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षीत आहे. येत्या १५ जुनपर्यंत मानोरा नगर पंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त झाली पाहिजे हे शक्य आहे. फक्त ही लोकचळवळ झाली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी यांनी केले.मानोरा नगर पंचायतीच्या सभागृहात  स्वच्छ भारत अभियान सभेत अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष रेखाताई पाचडे, जिल्हा प्रशासन अधिकारी दिपक मोरे, स्वच्छ भारत अभियान नगर विकास कक्ष मंत्रालय मुंबईचे सुहास चव्हाण, नायब तहसीलदार तायडे, ठाणेदार मळघणे,  आदिंची उपस्थिती होती. यावेळी प्रथम मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पुजन केले.यावेळी आपल्या भाषणात व्दिवेदी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद व नगर पंचायत १०० टक्क हागणदारीमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. चार न.प.झाल्या, मालेगाव न.प.चे ८० टकके काम झाले, मात्र मानोरा न.प. मागे आहे. केवळ २० टक्केच काम झाले. येत्या १५ जुनपर्यंत आपण सर्वांनी सहकार्य क रुन हे काम १००  टक्के करायचे आहे असे झाल्यास संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त होईल व राज्यात वाशिम जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागेल. कारण सिंधुदुर्ग जिल्हा घोषीत झाला आहे. स्टाफ नाही असे कारण पुढे करु नका, शौचालय बांधण्यासाठी स्टाफची गरज नाही. नगरसेवक व लाभार्थीनी प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष रेखाताई पाचडे, दिपक मोरे, सुहास चव्हाण यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. नगरसेवक अमोल राऊत यांनी नगर पंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त करुन दाखवू असा विश्वास दिला. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शौचालय बांधणाऱ्या  सुफियाबी अब्दूल शब्बीर पानवाले, सरस्वताबाई साळवे, सखुबाई मनोहर कलीया, या महिलांचा जिल्हाधिकारी याचेहस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी केल. ६१९ अर्ज लाभार्थींचे आले पैकी १२८ शौचालय पूर्ण झाले. १८८ चे काम प्रगतीपथावर आहे असेही त्यांनी सांगितले. येत्या १५ जुनपर्यंत सर्व नगरसेवकांनी सहकार्य केले तर निश्चित टार्गेट पूर्ण करु असा विश्वास त्यांनी दिला.  संचालन माळकर यांनीच केले. बांधकाम अभियंता अमोल राठोड यांनी आभार व्यक्त केले.