शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

गांधी जंयतीपासून ‘स्वच्छ भारत मिशन’

By admin | Updated: October 2, 2014 01:24 IST

वाशिम जिल्ह्यात गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर स्वच्छतेची शपथ.

वाशिम : राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभेचे आयोजन केले आहे. सदर ग्रामसभेत व गांधी जयंती निमित्त होणार्‍या कार्यक्रमात गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर स्वच्छतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे (पं.स.) यांनी दिली. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले निर्मल भारत अभियान आता अधिक गतिमान करण्यासाठी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन २ ऑक्टोबर रोजी ह्यस्वच्छ भारत मिशनह्ण असे नामांतर करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणुन २५ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर २0१४ या दरम्यान राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी जयंती निमित्त होणार्‍या कार्यक्रमात जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तालुकास्तरावर गटविकास अधिकारी आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचार्‍यांना स्वच्छतेची शपथ देणार आहेत. तसेच या अभियानात निवडलेल्या सुमारे ४४ ग्रामपंचायतींमध्ये जिल्हा व तालुका स्तरावरील सल्लागार आणि समन्वयक ग्रामसभेत स्वच्छतेची शपथ देणार आहेत. या अभियानामध्ये प्रत्यक्ष गृहभेटींना २ ऑक्टोबरपासून सुरवात होणार आहे. नेमुन दिलेल्या गावात दररोज किमान पाच कुटुंबातील सदस्यांना भेटुन याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.