शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जंयतीपासून ‘स्वच्छ भारत मिशन’

By admin | Updated: October 2, 2014 01:24 IST

वाशिम जिल्ह्यात गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर स्वच्छतेची शपथ.

वाशिम : राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभेचे आयोजन केले आहे. सदर ग्रामसभेत व गांधी जयंती निमित्त होणार्‍या कार्यक्रमात गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर स्वच्छतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे (पं.स.) यांनी दिली. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले निर्मल भारत अभियान आता अधिक गतिमान करण्यासाठी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन २ ऑक्टोबर रोजी ह्यस्वच्छ भारत मिशनह्ण असे नामांतर करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणुन २५ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर २0१४ या दरम्यान राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी जयंती निमित्त होणार्‍या कार्यक्रमात जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तालुकास्तरावर गटविकास अधिकारी आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचार्‍यांना स्वच्छतेची शपथ देणार आहेत. तसेच या अभियानात निवडलेल्या सुमारे ४४ ग्रामपंचायतींमध्ये जिल्हा व तालुका स्तरावरील सल्लागार आणि समन्वयक ग्रामसभेत स्वच्छतेची शपथ देणार आहेत. या अभियानामध्ये प्रत्यक्ष गृहभेटींना २ ऑक्टोबरपासून सुरवात होणार आहे. नेमुन दिलेल्या गावात दररोज किमान पाच कुटुंबातील सदस्यांना भेटुन याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.