शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

वाशिम : राज्यात ग्रामीण गृहनिर्माणाला गती देण्यासाठी राबविण्यात आलेल्या महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत पूर्ण झालेल्या सुमारे तीन लाख २२ ...

वाशिम : राज्यात ग्रामीण गृहनिर्माणाला गती देण्यासाठी राबविण्यात आलेल्या महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत पूर्ण झालेल्या सुमारे तीन लाख २२ हजार घरकुलांच्या लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश सोहळा १५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या सुपुर्द करून पार पडला. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या सोहळ्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सहा घरकुल लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या.

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, समाजकल्याण समितीचे सभापती वनिता देवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हास्तरावर प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी दिगांबर सावके (शेलू खु., ता. वाशिम), रामदास खंडरे (मंगळसा, ता. मंगरूळपीर), अनुसया ठाकूर (चांडस, ता. मालेगाव), रमाई आवास योजनेचे लाभार्थी सुधाकर खडसे (ब्राह्मणवाडा, ता. वाशिम), गजानन खिराडे (मंगळसा, ता. मंगरूळपीर), जनार्धन चंद्रशेखर (भेरा, ता. मालेगाव) या लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या. पंचायत समिती स्तरावरसुद्धा गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राज्यात महा आवास अभियान (ग्रामीण) राबविण्यात आले. या योजनांमध्ये केंद्र व राज्य शासनपुरस्कृत आवास योजनांची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपले स्वतःचे घर असावे, हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. आवास योजनांच्या माध्यमातून राज्यात सुमारे ३ लक्ष २२ हजार कुटुंबांचे हे स्वप्न सत्यात आले आहे. ज्या व्यक्तींकडे घरासाठी स्वतःच्या मालकीची जमीन नाही, अशा लाभार्थ्यांना घरासाठी जमीनही उपलब्ध करून देण्यात आली. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घरकुलांचे काम पूर्ण झाले, हे कौतुकास्पद असल्याचे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच मंगळवारी गृहप्रवेश केलेल्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या; तसेच आपले घर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले. स्वतःचे पक्के घर झाल्याचे समाधान आहे; तसेच पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले, अशा प्रतिक्रिया यावेळी लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.