शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

लाखोंचे श्रद्धास्थान गोवर्धन येथील चंदनशेष मंदिर

By admin | Updated: August 1, 2014 02:18 IST

नागपंचमी विशेष रिसोड तालुक्यातील देवस्थान

निनाद देशमुख /रिसोडरिसोडपासून जवळपास २५ किलोमीटर अंतरावरील गोवर्धन गाव. या गावाजवळ ढोणगाव रस्त्यावर चंदनशेष महाराजांचे भव्य मंदिर आहे. या ठिकाणी नागपंचमीनिमित्त जवळपास एक लाख भाविक गोवर्धन या गावी येथून नागदेवतांच्या दर्शनाचा लाभ घेण्याकरिता येत असतात. जिल्हय़ातील तसेच जिल्हय़ाबाहेरील चंदनशेष महाराजांचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिराबाबत गावातील ज्येष्ठ लोकांच्या अनुभवानुसार सुमारे दीडशे वर्षांपूर्वी रावजी बापू वाघ हे नागपंचमीच्या दिवशी शेतात जमिनीची मशागत करीत असताना त्यांना निगरुडीच्या झाडाखाली साप चावला होता; परंतु त्यांचे विष उतरुन ते जिवंत राहिले. जवळपास पंधरा दिवसानंतर नागदेवता त्यांच्या स्वप्नामध्ये आली. तिने नागदेवतेचे मंदिर स्थापन कर, असा उपदेश दिला. यापुढे त्यांनी तेथे नागदेवता स्थापून चंदनशेष महाराज या नागदेवतेची मनोभावे सेवा केली, अशी अख्यायिका आहे. त्यांच्या घरातील जवळपास तीन पिढय़ानपासून ही सेवा कायम चालविली जात असल्याचे गावातील नागरिक रमेशराव वाघ यांनी सांगितले. पुढे नागोराव वाघ यांनी मंदिराची उभारणी केली.निसर्गसौंदर्यांनी वेढलेल्या मंदिराच्या समोरच जुने वडाचे झाड असून, पंचक्रोशिसह परजिल्हय़ातीलही कोणालाही सर्पदंश झाल्यास त्यांनी डोळय़ावर दगड ठेवल्यास किंवा जात्याची पाळ देऊन मागे न पाहता चंदनशेष महाराजांकडे गेले तर विषाचा उतारा होऊन माणूस जिवंत राहतो, अशी या परिसरातील नागरिकांची श्रद्धा आहे.फार वर्षांपूर्वी या ठिकाणी घनदाट जंगलात फार मोठे वारुळ होते. या गावातील लोक आपल्या घरामध्ये साप निघाल्यास मंदिर परिसरातील वाळू आणून घराभोवती टाकल्यास साप घरात येत नाही, असे येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. नागपंचमीच्या दिवशी या गावात शेतातील कुठलेही मशागतीचे काम ग्रामस्थ करीत नाहीत. शेतात मशागतीचे काम केल्यास नागदेवतेला इजा होऊ शकते, असे गावातील लोक सांगतात. नागपंचमीच्या दिवशी येथे रिसोड तालुक्यासहित अकोला, बुलडाणा, परभणी, हिंगोली या ठिकाणाहून जवळपास एक दीड लाख भाविक नागदेवतेच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या निधीतून दोन सभा मंडपाची उभारणी झाली आहे. यात्रेनिमित्त भाविकांची रेलचेल पाहून पोलिस प्रशासन बंदोबस्तासाठी तैनात असते. गावातील नायबराव वाघ व सदाशिवराव वाघ हे आपला वारसा प्रमाणे मंदिराची अखंड सेवा करीत असतात. चंदनशेष महाराजांचे हे मंदिर पंचक्रोशितील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते.