शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

भरारी पथकाच्या ग्रामीण भागातील कार्यालयांना आकस्मिक भेटी

By admin | Updated: October 24, 2016 17:34 IST

जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या पथकाने ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांना आकस्मिक भेटी देण्याची मोहिम हाती घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 24 - जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या पथकाने ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांना आकस्मिक भेटी देण्याची मोहिम हाती घेतली आहे. यामुळे शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशू दवाखाने, ग्रामपंचायत आदी कार्यालयांचे कर्मचारी सतर्क झाल्याचे दिसून येते.
ग्रामीण व तालुकास्तरीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची दैनंदिन उपस्थिती तपासणे, दांडीबाज अधिकारी-कर्मचाºयांवर नियंत्रण मिळविणे, कामकाजात गतिमानता आणणे, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भरारी पथकांनी ग्रामीण व तालुकास्तरीय कार्यालयांना आकस्मिक भेटी देण्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांचे भरारी पथक तयार केले. या भरारी पथकाने महिन्यातून किमान दोन कार्यालयांना भेटी देणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २४ आॅक्टोबरपासून सुरू झाली. दिवाळीच्या सुट्ट्यानंतर एक भरारी पथक १५ दिवसांतून एकदा ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांना आकस्मिक भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहे. याचा अहवाल थेट मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सादर केला जाणार आहे.