शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बँकांमध्ये रोखीचा तुटवडाच

By admin | Updated: June 5, 2017 19:00 IST

वाशिम: केंद्राच्या ८ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलन कल्लोळ अद्यापही कायमच आहे. बँकांमध्ये रोखीचा तुटवडा असल्याने अनेक व्यवहार अडचणीत येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: केंद्राच्या ८ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलन कल्लोळ अद्यापही कायमच आहे. बँकांमध्ये रोखीचा तुटवडा असल्याने अनेक व्यवहार अडचणीत येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यामुळे सुरवातीचे चार महिने सर्वच स्तरातील जनता आणि व्यावसायिकांना रोखीच्या तुटवड्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यानच्या काळात शासनाने दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतरही रिझर्व्ह बँकेकडून गरजेनुसार पतपुरवठा करण्यात येत नसल्याने बॅकिंग सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे सर्वच प्रकारच्या व्यवहारावर परिणाम झाला. बँकेतील रोखीच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि नोकरदार वर्गाला बसला आणि तो अद्यापही कायम आहे. शासनाच्या धोरणानुसार शासकीय नोकरदारांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने बँकेत जमा होते; परंतु बँकेत खात्यावर वेतनाची रक्कम जमा झाल्यानंतरही संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात विड्रॉल मिळत नाही. त्यामुळे त्यांचे इतर खासगी व्यवहार विस्कळीत झाले आहे. शेतकरी वर्गाचा विचार केल्यास मागील महिन्यापर्यंत सुरू असलेल्या नाफेडच्या तूर खरेदीसह बाजार समितीत विकलेल्या धान्याचा चुकारा काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना धनादेशाच्या स्वरूपात मिळत होता. तथापि, बँकेत रोकडच नसल्याने धनादेश वटविणेही अवघड होऊन बसले. ही परिस्थिती बव्हंशी अद्यापही कायमच आहे.