शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

ग्रामसभेच्या त्या ठरावाची अट रद्द करावी

By admin | Updated: May 23, 2017 17:44 IST

सरपंच संघटनेने ग्रामविकास मंत्र्याला पाठवले निवेदन.

मंगरुळपीर : घरात शौचालय आहे, पंरतु शौचायालयाचा नियमित वापर होत आहे. याबाबतचा ग्रामसभेचा ठराव नसेल तर संबंधीत सरपंच किंवा सदस्याला अपात्र ठरविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यामुळे राज्यातील हजारो सरपंच ग्रा.पं.सदस्य अपात्र ठरु शकतात, परंतु हा निर्णय निरर्थक असून तो रद्द करावा अशी मागणी सरपंच संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाकधने यांनी ग्रामविकास मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, मुंबई ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमात सन २०११ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मुद्यानुसार ग्राम पंचायतची निवडणुक लढवितांना उमेदवाराने त्याचे घरात शौचालय असल्याचे ग्रामसचिवाचे  प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे, पण त्यानंतरही या शौचायालचा नियमित वापर केला जात असल्याचा ग्रामसभेचा ठराव सुध्दा निर्धारीत यंत्रणेकडे एक वर्षाच्या आत सादर करणे गरजेचे आहे. परंतु राज्यातील ८० टक्के ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी असा ठराव सादर केला नसल्याचे समजते. त्यामुळे अशा सदस्य व सरपंचाना तक्रार झाल्यास आपली पदे गमवावी लागतील. शिवाय यामुळे ग्राम पंचायतमधील राजकारणापायी तक्रारी होवुन वाद होण्याची सुध्दा शक्यता आहे. तेव्हा सदरची निरर्थक व हास्यास्पद असणारी अट रद्द करावी अशी मागणी पाकधने यांनी केली आहे.