शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

गुडमॉर्निंंग पथकाची धडक मोहीम

By admin | Updated: October 24, 2016 02:25 IST

मोहीम जोरात; उघड्यावर शौचास जाणा-यांत धास्ती.

वाशिम, दि. २३- जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायती या हणगदरीमुक्त झाल्या असल्या तरी, स्वच्छ भारत मिशनचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झाले नाही. उद्दिष्टपूर्तीसाठी गूडमॉनिर्ंग पथकाने उघड्यावर शौचास जाणार्‍यांचे टमरेल जप्त केल्यामुळे ग्रामस्थांनी या मोहिमेची धास् ती घेतली आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात हगणदरीमुक्त गाव मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेतंर्गत सध्या तालुकानिहाय गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले असून, हे पथक उघड्यावर शौचास जाणार्‍या ग्रामस्थांची चांगलीच गोची करीत आहेत. सकाळच्या प्रहरीच जिल्ह्यातील ग्रामस्थांना या पथकाचे दर्शन घडत असून, कारवाईचा धाक व बदनामीच्या भीतीपोटी उघड्यावरील हगणदारीचे प्रस्थ कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळेच सध्या जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाल्या आहेत. गावागावात जावून शौचालय नसणार्‍या कुटुंबांच्या भेटी घेतल्या. या प्रयत्नांना जिल्ह्यात चांगले यश प्राप्त झाले. गेल्या २ ऑक्टोबर रोजी भेटी गाठी स्वच्छतेसाठी या उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायती पूर्णपणे उघड्यावरील हागणदारीमुक्त झाल्या हो त्या. यानंतर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाकडून दुसर्‍या टप्प्यात गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले. जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, वाशीम, रिसोड व मालेगाव अशा सहाही तालुक्यात तालुकास्तरीय गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले असून, कारंजा तालुक्यात गूड इव्हिनिंग पथकही कार्यान्वित करण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावरील गुडमॉर्र्निंंंंग पथक गावात सकाळी सहा पूर्वीच दाखल होते. या पथकात पुरूष व महिला कर्मचार्‍यांसह संबंधित गावातील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच किंवा सदस्यांचाही समावेश असतो. कोणालाच मागमूस न लागे देता हे पथक गावकुसावर उभे राहून उघड्यावर शौचास जाणार्‍यांची प्रतिक्षा कर ते आणि उघड्यावर शौचास जाणारा पुरुष वा महिलाही आढळून आल्यास त्यांच्या हा तामधील टमरेल जप्त करीत आहे. त्याशिवाय गावांगावात जनजागृती करून लोकांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यात शौचालय बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाच्यावतीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या गृहभेटी अभियानाचाही मोठा फरक पडला असून, या अभियानांतर्गत विविध अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकार्‍यांनी सतत लोकांच्या भेटी घेऊन त्यांना स्वच्छ तेचे महत्त्व पटवून दिले. याचा परिणाम म्हणून महिनाभरात जिल्ह्यातील साडे चार हजारांच्या कुटूंबांनी शौचालय बांधून घेतले आहे.