शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

गुडमॉर्निंंग पथकाची धडक मोहीम

By admin | Updated: October 24, 2016 02:25 IST

मोहीम जोरात; उघड्यावर शौचास जाणा-यांत धास्ती.

वाशिम, दि. २३- जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायती या हणगदरीमुक्त झाल्या असल्या तरी, स्वच्छ भारत मिशनचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झाले नाही. उद्दिष्टपूर्तीसाठी गूडमॉनिर्ंग पथकाने उघड्यावर शौचास जाणार्‍यांचे टमरेल जप्त केल्यामुळे ग्रामस्थांनी या मोहिमेची धास् ती घेतली आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात हगणदरीमुक्त गाव मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेतंर्गत सध्या तालुकानिहाय गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले असून, हे पथक उघड्यावर शौचास जाणार्‍या ग्रामस्थांची चांगलीच गोची करीत आहेत. सकाळच्या प्रहरीच जिल्ह्यातील ग्रामस्थांना या पथकाचे दर्शन घडत असून, कारवाईचा धाक व बदनामीच्या भीतीपोटी उघड्यावरील हगणदारीचे प्रस्थ कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळेच सध्या जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाल्या आहेत. गावागावात जावून शौचालय नसणार्‍या कुटुंबांच्या भेटी घेतल्या. या प्रयत्नांना जिल्ह्यात चांगले यश प्राप्त झाले. गेल्या २ ऑक्टोबर रोजी भेटी गाठी स्वच्छतेसाठी या उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायती पूर्णपणे उघड्यावरील हागणदारीमुक्त झाल्या हो त्या. यानंतर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाकडून दुसर्‍या टप्प्यात गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले. जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, वाशीम, रिसोड व मालेगाव अशा सहाही तालुक्यात तालुकास्तरीय गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले असून, कारंजा तालुक्यात गूड इव्हिनिंग पथकही कार्यान्वित करण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावरील गुडमॉर्र्निंंंंग पथक गावात सकाळी सहा पूर्वीच दाखल होते. या पथकात पुरूष व महिला कर्मचार्‍यांसह संबंधित गावातील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच किंवा सदस्यांचाही समावेश असतो. कोणालाच मागमूस न लागे देता हे पथक गावकुसावर उभे राहून उघड्यावर शौचास जाणार्‍यांची प्रतिक्षा कर ते आणि उघड्यावर शौचास जाणारा पुरुष वा महिलाही आढळून आल्यास त्यांच्या हा तामधील टमरेल जप्त करीत आहे. त्याशिवाय गावांगावात जनजागृती करून लोकांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यात शौचालय बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाच्यावतीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या गृहभेटी अभियानाचाही मोठा फरक पडला असून, या अभियानांतर्गत विविध अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकार्‍यांनी सतत लोकांच्या भेटी घेऊन त्यांना स्वच्छ तेचे महत्त्व पटवून दिले. याचा परिणाम म्हणून महिनाभरात जिल्ह्यातील साडे चार हजारांच्या कुटूंबांनी शौचालय बांधून घेतले आहे.