शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकांतील सुरक्षा व्यवस्था वा-यावर!

By admin | Updated: February 14, 2017 01:50 IST

बेवारस वस्तूंवर देखरेख नाही : पोलिसांचा ‘वॉच’ही नाही!

कारंजा/रिसोड/मंगरूळपीर : बसस्थानकांतील बेवारस वस्तूंपासून काही अनर्थ घडू नये म्हणून पोलीस व सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. या रक्षकांचा पहारा किती प्रामाणिक आहे, याची पडताळणी म्हणून ह्यलोकमतह्णने कारंजा, रिसोड व मंगरूळपीर आगारात सोमवारी स्टिंग केले असता, तब्बल एक ते दोन तास बेवारस वस्तू तशाच पडून असल्याचे दिसून आले.आतंकवादी किंवा समाजकंटकाद्वारे गर्दीच्या ठिकाणी घातपात घडवून आणण्याच्या घटना यापूर्वी राज्यातील काही ठिकाणी घडल्या आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रेल्वे व बसस्थानक परिसरात पोलीस व सुरक्षा रक्षकांचा ह्यवॉचह्ण ठेवण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यातील आगारांत पोलीस कर्मचारी तसेच आगाराचे स्वत:चे रक्षक तैनात आहेत. सुरक्षा यंत्रणेद्वारा बसस्थानकांत खरोखरच देखरेख ठेवली जाते का? याची पडताळणी म्हणून लोकमतच्या चमूने बुधवारी कारंजा, रिसोड व मंगरूळपीर आगारात बेवारस वस्तू ठेवून याकडे कुणाचे लक्ष जाते का, सुरक्षा रक्षक या प्रकाराला प्रतिबंध घालतो का, यासंदर्भात स्टिंग केले. यावेळी कोणत्याही बसस्थानकात सुरक्षा रक्षक किंवा पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. बसस्थानकातील आसनावर बेवारस वस्तूची पिशवी ठेवल्यानंतरही कुणी हटकले नाही किंवा या पिशवीची पाहणीदेखील केली नाही. एक ते दोन तास ही बेवारस पिशवी तशीच पडून होती. यावरून बसस्थानकांतील सुरक्षा व्यवस्था किती गाफील आहे, हे दिसून आले.