शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या बांधावरील काडीकचरा जाळण्यातून वृक्षांना झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

रब्बी हंगामातील पिकांची काढणी आटोपल्यानंतर उन्हाचे प्रमाण वाढू लागताच शेतकरी खरीप हंगामाची तयारी सुरू करतात. यासाठी प्राथमिक टप्प्यात शेतातील ...

रब्बी हंगामातील पिकांची काढणी आटोपल्यानंतर उन्हाचे प्रमाण वाढू लागताच शेतकरी खरीप हंगामाची तयारी सुरू करतात. यासाठी प्राथमिक टप्प्यात शेतातील पिकांचे अवशेष, बांधावरील झुडपे, काडीकचरा गोळा करून ते जाळून नष्ट करण्याचे काम केले जाते. या प्रकारातून शेतीच्या बांधावर असलेल्या वृक्षांचे बुंधे पेटतात आणि मोठमोठे वृक्ष अर्ध्यावर पेटल्याने सुकून पडतात. दरवर्षी या प्रकारातून जिल्ह्यात शेकडो वृक्ष नष्ट होत आहेत. यातून पर्यावरणाची अपरिमित हानी होते. तथापि, पर्यावरण विभाग, वनविभाग किंवा महसूल विभाग यावर नियंत्रण मिळविण्याचा मुळीच प्रयत्न करताना दिसत नाही. यंदाही गेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी शेती मशागतीसाठी काडीकचरा जाळण्याचे काम सुरू केले आहे. यातून अनेक ठिकाणी शेतीच्या बांधावरील मोठमोठे वृक्ष पेटल्याने सुकत असल्याचे चित्र दिसत आहे.

------------

एक प्रौढ वृक्ष शोषतो ४८ पौंड कार्बनडाय ऑक्साईड

हिरव्या वनस्पती आपल्या पानांद्वारे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड वायू शोषून घेतात, तर एक प्रौढ वृक्ष वातावरणातील ४८ पौंड कार्बनडाय ऑक्साईड शोषून दररोज सरासरी २३० लिटर ऑक्सिजन उत्सर्जित करतो. दुसरीकडे एखाद्या व्यक्तीने श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसात घेतलेल्या हवेमध्ये २० टक्के ऑक्सिजन असतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी तीन प्रौढ वृक्षांची आवश्यकता असते. त्यामुळे वृक्षांचे संवर्धन करून त्यांची संख्या वाढविणे आवश्यक असताना जिल्ह्यात दरवर्षी मशागतीसाठी पेटविल्या जाणाऱ्या कचऱ्यातून हजारो वृक्ष नष्ट होत आहेत.

---------

सर्वच मुख्य मार्गासह ग्रामीण मार्गावर दिसतो प्रकार

जिल्ह्यातील वाशिम-कारंजा, वाशिम-पुसद, मानोरा-महान, वाशिम-अकोला, रिसोड-वाशिम या मुख्यमार्गासह ग्रामीण भागांतील मार्गांवर हे चित्र पाहायला मिळत आहे. काडीकचरा जाळण्यातून केवळ वृक्षच नष्ट होत नाहीत, तर शेतजमिनीतील सूक्ष्मजीवही नष्ट होत असल्याने जमिनीची सुपीकता घटत आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यातही जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असताना शेतकरी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करून त्यात अधिक भर टाकत आहेत.