शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

शेतीच्या बांधावरील काडीकचरा जाळण्यातून वृक्षांना झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

रब्बी हंगामातील पिकांची काढणी आटोपल्यानंतर उन्हाचे प्रमाण वाढू लागताच शेतकरी खरीप हंगामाची तयारी सुरू करतात. यासाठी प्राथमिक टप्प्यात शेतातील ...

रब्बी हंगामातील पिकांची काढणी आटोपल्यानंतर उन्हाचे प्रमाण वाढू लागताच शेतकरी खरीप हंगामाची तयारी सुरू करतात. यासाठी प्राथमिक टप्प्यात शेतातील पिकांचे अवशेष, बांधावरील झुडपे, काडीकचरा गोळा करून ते जाळून नष्ट करण्याचे काम केले जाते. या प्रकारातून शेतीच्या बांधावर असलेल्या वृक्षांचे बुंधे पेटतात आणि मोठमोठे वृक्ष अर्ध्यावर पेटल्याने सुकून पडतात. दरवर्षी या प्रकारातून जिल्ह्यात शेकडो वृक्ष नष्ट होत आहेत. यातून पर्यावरणाची अपरिमित हानी होते. तथापि, पर्यावरण विभाग, वनविभाग किंवा महसूल विभाग यावर नियंत्रण मिळविण्याचा मुळीच प्रयत्न करताना दिसत नाही. यंदाही गेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी शेती मशागतीसाठी काडीकचरा जाळण्याचे काम सुरू केले आहे. यातून अनेक ठिकाणी शेतीच्या बांधावरील मोठमोठे वृक्ष पेटल्याने सुकत असल्याचे चित्र दिसत आहे.

------------

एक प्रौढ वृक्ष शोषतो ४८ पौंड कार्बनडाय ऑक्साईड

हिरव्या वनस्पती आपल्या पानांद्वारे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड वायू शोषून घेतात, तर एक प्रौढ वृक्ष वातावरणातील ४८ पौंड कार्बनडाय ऑक्साईड शोषून दररोज सरासरी २३० लिटर ऑक्सिजन उत्सर्जित करतो. दुसरीकडे एखाद्या व्यक्तीने श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसात घेतलेल्या हवेमध्ये २० टक्के ऑक्सिजन असतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी तीन प्रौढ वृक्षांची आवश्यकता असते. त्यामुळे वृक्षांचे संवर्धन करून त्यांची संख्या वाढविणे आवश्यक असताना जिल्ह्यात दरवर्षी मशागतीसाठी पेटविल्या जाणाऱ्या कचऱ्यातून हजारो वृक्ष नष्ट होत आहेत.

---------

सर्वच मुख्य मार्गासह ग्रामीण मार्गावर दिसतो प्रकार

जिल्ह्यातील वाशिम-कारंजा, वाशिम-पुसद, मानोरा-महान, वाशिम-अकोला, रिसोड-वाशिम या मुख्यमार्गासह ग्रामीण भागांतील मार्गांवर हे चित्र पाहायला मिळत आहे. काडीकचरा जाळण्यातून केवळ वृक्षच नष्ट होत नाहीत, तर शेतजमिनीतील सूक्ष्मजीवही नष्ट होत असल्याने जमिनीची सुपीकता घटत आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यातही जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असताना शेतकरी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करून त्यात अधिक भर टाकत आहेत.