शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

एकाच सचिवाकडे पाच गावांच्या कामाचा बोजा

By admin | Updated: June 14, 2014 23:41 IST

ग्रामसचिवांकडे तीन ते पाच गावांची जबाबदारी तर काही ग्रामसचिवाकडे केवळ एकाच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासला गेला आहे.

पांडवउमरा : वाशिम पंचायत समितींतर्गत येणार्‍या ग्रामसचिवांकडे समान गावांची जबाबदारी सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. काही ग्रामसचिवांकडे तीन ते पाच गावांची जबाबदारी तर काही ग्रामसचिवाकडे केवळ एकाच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासला गेला आहे.शासनाच्या कल्याणकारी योजना गावपातळीवर पोहोचविण्याबरोबरच गावाचा विकास साधण्याचे काम ग्रामसचिवांकडे सोपविण्यात आले आहे. वाशिम पंचायत समितींतर्गत एकूण ८४ ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे साधारणत: ७0 च्या आसपास ग्रामसचिवांची पदे भरणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत ६१ ग्रामसचिव कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यातही तीन ग्रामसचिवांना कार्यालयीन कामकाजात गुंतविण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रतिनियुक्तीवरील कर्मचार्‍यांना मुळ ठिकाणी पाठविण्याचे निर्देश दिलेले आहेत. तथापि वाशिम पंचायत समितीमध्ये मात्र जयवंशी यांच्या निर्देशांची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. पी.एल. माने नामक ग्रामसचिवाकडे सावंगा जहाँगीर, पांडवउमरा, माळेगाव, तांदळी शेवई, जनुना अशा पाच गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे. पाच गावांचा कारभार पाहताना एकाच कर्मचार्‍यांची दमछाक होते तर काही ग्रामसचिवांकडे केवळ एकाच गावांचा कारभार देण्यात आला आहे. यामुळे जबाबदारी सोपविताना ह्यभेदह्ण तर केला जात नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. प्रत्येक गाव हे सरासरी ७ किलोमीटर अंतरावर असून मुख्यालयापासून ४ गावाला दररोज भेट द्यायची झाली तर ७0 किलोमीटर जाणे-येणे असा प्रवास एका ग्रामसेवकाला करावा लागतो. शासकीय योजना लवकर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कामाचे समान वाटप होणे आवश्यक असताना अनेक ग्रामसचिवांकडे केवळ एकाच गावांचा कारभार असल्याने उर्वरीत ग्रामसचिवांकडे प्रकरणांच्या ह्यपेंडींगह्णची संख्या वाढत चालली आहे. तीन ग्रामसचिव कार्यालयीन कामकाजासाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे ५८ ग्रामसेवकांना ८४ ग्रा.पं.ींचा कारभार सांभाळावा लागत आहे. कार्यालयीन कामकाजात तीन ग्रामसचिवांना घेतले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना मूळ पदावर जाण्याचे फर्मान सोडूनही पं.स.प्रशासन आपल्याच निर्णयावर ठाम राहत असल्याचे दिसून येत आहे.