शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

एकाच सचिवाकडे पाच गावांच्या कामाचा बोजा

By admin | Updated: June 14, 2014 23:41 IST

ग्रामसचिवांकडे तीन ते पाच गावांची जबाबदारी तर काही ग्रामसचिवाकडे केवळ एकाच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासला गेला आहे.

पांडवउमरा : वाशिम पंचायत समितींतर्गत येणार्‍या ग्रामसचिवांकडे समान गावांची जबाबदारी सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. काही ग्रामसचिवांकडे तीन ते पाच गावांची जबाबदारी तर काही ग्रामसचिवाकडे केवळ एकाच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासला गेला आहे.शासनाच्या कल्याणकारी योजना गावपातळीवर पोहोचविण्याबरोबरच गावाचा विकास साधण्याचे काम ग्रामसचिवांकडे सोपविण्यात आले आहे. वाशिम पंचायत समितींतर्गत एकूण ८४ ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे साधारणत: ७0 च्या आसपास ग्रामसचिवांची पदे भरणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत ६१ ग्रामसचिव कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यातही तीन ग्रामसचिवांना कार्यालयीन कामकाजात गुंतविण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रतिनियुक्तीवरील कर्मचार्‍यांना मुळ ठिकाणी पाठविण्याचे निर्देश दिलेले आहेत. तथापि वाशिम पंचायत समितीमध्ये मात्र जयवंशी यांच्या निर्देशांची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. पी.एल. माने नामक ग्रामसचिवाकडे सावंगा जहाँगीर, पांडवउमरा, माळेगाव, तांदळी शेवई, जनुना अशा पाच गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे. पाच गावांचा कारभार पाहताना एकाच कर्मचार्‍यांची दमछाक होते तर काही ग्रामसचिवांकडे केवळ एकाच गावांचा कारभार देण्यात आला आहे. यामुळे जबाबदारी सोपविताना ह्यभेदह्ण तर केला जात नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. प्रत्येक गाव हे सरासरी ७ किलोमीटर अंतरावर असून मुख्यालयापासून ४ गावाला दररोज भेट द्यायची झाली तर ७0 किलोमीटर जाणे-येणे असा प्रवास एका ग्रामसेवकाला करावा लागतो. शासकीय योजना लवकर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कामाचे समान वाटप होणे आवश्यक असताना अनेक ग्रामसचिवांकडे केवळ एकाच गावांचा कारभार असल्याने उर्वरीत ग्रामसचिवांकडे प्रकरणांच्या ह्यपेंडींगह्णची संख्या वाढत चालली आहे. तीन ग्रामसचिव कार्यालयीन कामकाजासाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे ५८ ग्रामसेवकांना ८४ ग्रा.पं.ींचा कारभार सांभाळावा लागत आहे. कार्यालयीन कामकाजात तीन ग्रामसचिवांना घेतले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना मूळ पदावर जाण्याचे फर्मान सोडूनही पं.स.प्रशासन आपल्याच निर्णयावर ठाम राहत असल्याचे दिसून येत आहे.