शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

सूसंस्कार घडवून तीन कन्यांचे भविष्य केले उज्ज्वल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

शेलूबाजार : भारतीय संस्कृतीत आजही मुलगा हाच वंशाचा दिवा मानून मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातोय. या वृत्तीला तडा देणारी ...

शेलूबाजार : भारतीय संस्कृतीत आजही मुलगा हाच वंशाचा दिवा मानून मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातोय. या वृत्तीला तडा देणारी अनेक उदाहरणेही आहेत. असेच एक उदाहरण मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथे पाहायला मिळते. तऱ्हाळा येथील नारायण वाघमारे यांनी मुलाचा हट्ट न करता आपल्या तीन मुलींवर सुसंस्कार करून त्यांना उच्चशिक्षण देत पोलीस खात्यात दाखल करून समाजासमोर आदर्श निर्माण केला तऱ्हाळा येथील नारायण प्रल्हादराव वाघमारे हे शेतमजूर आहेत. आधीच घरी गरिबी असताना त्यांच्या घरात तीन मुलींनी जन्म घेतला. प्रिया (२४), भाग्यश्री (२१) आणि श्रद्धा (१९) अशी त्यांची नावे. नारायण वाघमारे यांनी कधीही मुलींचा अव्हेर केला नाही. त्यांच्यावर राग काढला नाही किंवा घरच्या परिस्थितीमुळे त्यांचा कामासाठी आधारही घेतला नाही. अगदी लाड कौतुकाने या तिघींचा सांभाळ केला. त्यांच्यावर चांगले संस्कार घडविले, पोटाला चिमटा देऊन त्यांना शिक्षण दिले. यासाठी पत्नीचेही त्यांना सहकार्य लाभले. हलाखीच्या स्थितीत पित्याकडून होणारे लाडकौतुक आणि संस्कारांचा मुलींवर सकारात्मक परिणाम झाला. त्यांनी तऱ्हाळा येथे प्राथमिक, तर शेलूबाजार येथे माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी मंगरुळपीर येथे उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच नोकरीची जिद्द मनात ठेवून त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यात २०१३ या पोलीस भरतीत प्रिया शिपाई पदासाठी पात्र ठरली. थोरल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत भाग्यश्री आणि श्रद्धानेही पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि २०१८ च्या पोलीस भरतीत या दोघींचीही शिपाई पदासाठी निवड झाली. सद्यस्थितीत प्रिया ही मंगरुळपीर उपविभागांतर्गत आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये, तर भाग्यश्री आणि श्रद्धा या दोघी अकोला येथे कर्तव्य बजावत आहेत.

--------------

तिघीनेही घेतले पदवीपर्यंतचे शिक्षण

नारायण वाघमारे यांच्या मुली प्रिया, भाग्यश्री आणि श्रद्धा यांनी केवळ नोकरीचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच शिक्षण घेतले नाही. प्रत्यक्षात शिक्षणाचाही एक दर्जा असावा. समाजात वावरताना अभिमानाने सांगता यावे, तसेच ज्ञानात भर पडावी म्हणून त्या तिघींनीही पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

----- कोट:

सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेही स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी दाखविलेल्या मार्गानुुसारच मी तिन्ही मुलींवर चांगले संस्कार घडवित त्यांना शिक्षण दिले. त्यांनीही माझ्या भावनांचा मान राखत जिद्द आणि चिकाटीने शिक्षण घेतले. त्यात त्यांना यश आले. माझ्या तिन्ही मुलींचा मला सार्थ अभिमान आहे.

-नारायण वाघमारे (पिता),

तऱ्हाळा, ता. मंगरुळपीर