शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सूसंस्कार घडवून तीन कन्यांचे भविष्य केले उज्ज्वल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

शेलूबाजार : भारतीय संस्कृतीत आजही मुलगा हाच वंशाचा दिवा मानून मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातोय. या वृत्तीला तडा देणारी ...

शेलूबाजार : भारतीय संस्कृतीत आजही मुलगा हाच वंशाचा दिवा मानून मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातोय. या वृत्तीला तडा देणारी अनेक उदाहरणेही आहेत. असेच एक उदाहरण मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथे पाहायला मिळते. तऱ्हाळा येथील नारायण वाघमारे यांनी मुलाचा हट्ट न करता आपल्या तीन मुलींवर सुसंस्कार करून त्यांना उच्चशिक्षण देत पोलीस खात्यात दाखल करून समाजासमोर आदर्श निर्माण केला तऱ्हाळा येथील नारायण प्रल्हादराव वाघमारे हे शेतमजूर आहेत. आधीच घरी गरिबी असताना त्यांच्या घरात तीन मुलींनी जन्म घेतला. प्रिया (२४), भाग्यश्री (२१) आणि श्रद्धा (१९) अशी त्यांची नावे. नारायण वाघमारे यांनी कधीही मुलींचा अव्हेर केला नाही. त्यांच्यावर राग काढला नाही किंवा घरच्या परिस्थितीमुळे त्यांचा कामासाठी आधारही घेतला नाही. अगदी लाड कौतुकाने या तिघींचा सांभाळ केला. त्यांच्यावर चांगले संस्कार घडविले, पोटाला चिमटा देऊन त्यांना शिक्षण दिले. यासाठी पत्नीचेही त्यांना सहकार्य लाभले. हलाखीच्या स्थितीत पित्याकडून होणारे लाडकौतुक आणि संस्कारांचा मुलींवर सकारात्मक परिणाम झाला. त्यांनी तऱ्हाळा येथे प्राथमिक, तर शेलूबाजार येथे माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी मंगरुळपीर येथे उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच नोकरीची जिद्द मनात ठेवून त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यात २०१३ या पोलीस भरतीत प्रिया शिपाई पदासाठी पात्र ठरली. थोरल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत भाग्यश्री आणि श्रद्धानेही पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि २०१८ च्या पोलीस भरतीत या दोघींचीही शिपाई पदासाठी निवड झाली. सद्यस्थितीत प्रिया ही मंगरुळपीर उपविभागांतर्गत आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये, तर भाग्यश्री आणि श्रद्धा या दोघी अकोला येथे कर्तव्य बजावत आहेत.

--------------

तिघीनेही घेतले पदवीपर्यंतचे शिक्षण

नारायण वाघमारे यांच्या मुली प्रिया, भाग्यश्री आणि श्रद्धा यांनी केवळ नोकरीचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच शिक्षण घेतले नाही. प्रत्यक्षात शिक्षणाचाही एक दर्जा असावा. समाजात वावरताना अभिमानाने सांगता यावे, तसेच ज्ञानात भर पडावी म्हणून त्या तिघींनीही पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

----- कोट:

सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेही स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी दाखविलेल्या मार्गानुुसारच मी तिन्ही मुलींवर चांगले संस्कार घडवित त्यांना शिक्षण दिले. त्यांनीही माझ्या भावनांचा मान राखत जिद्द आणि चिकाटीने शिक्षण घेतले. त्यात त्यांना यश आले. माझ्या तिन्ही मुलींचा मला सार्थ अभिमान आहे.

-नारायण वाघमारे (पिता),

तऱ्हाळा, ता. मंगरुळपीर