शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पावसामुळे पूल उखडला; वाहतूक प्रभावित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:27 IST

गत आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. ११ ते १६ जूनदरम्यान चिखली-कवठा परिसरात संततधार पाऊस झाला. यामुळे कवठा ...

गत आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. ११ ते १६ जूनदरम्यान चिखली-कवठा परिसरात संततधार पाऊस झाला. यामुळे कवठा ते रिसोड यादरम्यान असलेल्या पुलाची एक बाजू पूर्णत: उखडली असल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक प्रभावित झाली आहे. या ठिकाणावरून पायदळ व दुचाकीने वाहनाने ये-जा सुरू आहे; मात्र चारचाकी वाहन जात नसल्याने गैरसोय होत आहे. रिसोड तालुक्यातील निर्माणाधीन पुलांची रखडलेली कामे व अस्तित्वात असलेल्या छोट्या स्वरूपातील जमीन समांतर पुलांमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टर शेतजमीन खरडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोकादायक अवस्थेतील या पुलांप्रमाणेच कवठा जिल्हा परिषद गटातील विविध ठिकाणांच्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ते व पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी स्वप्नील सरनाईक यांनी केली.

.........

कोट बॉक्स

कवठा-रिसोड या दरम्यानच्या पुलाची दुरुस्ती करण्याच्या सूचना रिसोड येथील अभियंत्यांना दिल्या आहेत. लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करून वाहनधारकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न आहे.

- सुनील कळमकर

कार्यकारी अभियंता,

सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम